शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गमतीतूनच आकाराला आली सात खंजेरीची कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:46 IST

महाराष्ट्र अनेक संत, महापुरुषाची कर्मभूमी राहिली आहे. आणि या महापुरूषांच्या परिवर्तनवादी कार्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख प्राप्त झाली आहे. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपासून फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याने समाजात अनेक परिवर्तन घडले आहेत.

ठळक मुद्देलोकमतशी बातचित : सत्यपाल महाराजांनी उलगडला कला प्रवासलोकमत मुलाखत

राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : महाराष्ट्र अनेक संत, महापुरुषाची कर्मभूमी राहिली आहे. आणि या महापुरूषांच्या परिवर्तनवादी कार्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख प्राप्त झाली आहे. याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांपासून फुले, शाहु, आंबेडकर यांच्या कार्याने समाजात अनेक परिवर्तन घडले आहेत. तेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या कार्याने प्रेरित होऊन सतत ५२ वर्षे सात खंजेरीच्या तालावर समाजात परिवर्तन घडविण्याचे कार्य महाराष्ट्राचे प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज करीत आहेत. बालपणात गंमतजंमत म्हणून उलटी खंजेरी वाजविली व तीच गंमत आता एका वेळेस सात खंजेरी वाजविण्याची कला ठरल्याचा उलगडा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ‘लोकमत’जवळ केला.मंगळवारला चिमूर तालुक्यातील तळोधी ( नाईक) येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज हे आले असता त्यांच्यासोबत प्रस्तुत प्रतिनिधीने दिलखुलास संवाद साधला.बालपणात मातीच्या मडक्याला कागद लावून खंजेरी बनवून वाजवत होतो. त्यातच मग उलटी खंजेरी वाजवण्याची गंमत करण्याचा प्रयत्न केला. त्या गंमतीतूनच सात खंजेरी वाजविण्याची कला अवगत झाल्याची कबुली देत यासाठी मी कुणाकडे शिकण्यासाठी गेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.माझे प्राथमिक शिक्षण अकोला जिल्ह्यातील सरसोली येथे तर ८ ते १० वर्गापर्यत राधाबाई गणगणे विद्यालय मुंडगाव येथे झाले. इयत्ता चवथीमध्ये असतानाच खंजेरी वाजविण्याची कला अवगत करीत तुकडोजी महाराजांचे भजन तथा गाडगेबाबांचे ‘गोपाला गोपाला’ या कीर्तनातूनच प्रेरणा घेतली. प्रबोधनाचा पहिला मोठा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या आठव्या पुण्यतिथी कार्यक्रमात मोझरी येथे केला. त्यानंतर सत्यपाल महाराजांनी पूर्ण राज्यभर १३ हजार ५०० प्रबोधनात्मक कार्यक्रम केले आहेत.शिवाजी महाराज, फुले , शाहु, आंबेडकर यांच्या विचारातून समाजातील अंधश्रद्धा, वाईट रुढीवर आघात करताना अनेक गावात विरोध झाला. जळगाव जिल्ह्यात कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्याचा प्रसंग ओढवला होता. मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई येथील कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकू हल्ला करून जखमी केले. मात्र या भ्याड हल्ल्यातून आपण बचावलो, असेही सत्यपालांनी यावेळी सांगितले.समाजातील अनिष्ठ रुढी परंपरा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. हा संकल्प फुले शाहु, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या स्वछतेचा मंत्र जनतेत पोहचून समाज परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामध्ये काही प्रमाणात यश येत आहे. समाज प्रबोधन करायचे असल्याने मी माझ्या कीर्तनाला व्यावसायिक स्वरुप दिले नाही. कारण या परिवर्तनाची मलाच गरज आहे, असेही महाराज म्हणाले. या प्रबोधनातून युवा पिढीने तंबाखु, खर्रा, दारू अशा व्यसनापासून दूर राहून फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून सज्जन माणूस बनविण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ त्यांनी स्पष्ट केले.