शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वरोऱ्यात साडेनऊ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 8:40 PM

वरोरा शहरातील गुड्स गॅरेजवर शनिवारी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून नऊ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे चोर बीटी बियाणे जप्त केले.

ठळक मुद्देगुड्स गॅरेजवर धाडअमरावतीहून बियाणे चंद्रपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : . वरोरा शहरातील गुड्स गॅरेजवर शनिवारी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून नऊ लाख ६२ हजार रूपये किंमतीचे चोर बीटी बियाणे जप्त केले. गॅरेजमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोर बिटी बियाणे जप्तीची ही कार्यवाही राज्यातील पहिलीच असल्याचे मानले जात आहे.बीटी कपाशी बियाणांनी लागवड केल्यास त्यावर रोगांना प्रादुर्भाव कमी होतो व उत्पादन अधिक प्रमाणात मिळते. या अंदाज घेऊन मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते. कपाशीच्या पेºयात दरवर्षी वाढ होत असे, पंरतु गेल्या हंगामात बीटी कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिकावर नांगर फिरविला. ज्या शेतकऱ्यांना बोंडअळी नंतर कापूस झाला त्याला अत्यल्प दर मिळाला. अश्या अनेक तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. कृषी विभाग यंदा हंगामाच्या काही महिन्यांपूर्वीच सतर्क झाला. वरोरा शहरातील मोहबाळा रस्त्यालगत मंगलम कार्यालय कॉम्प्लेक्स मधील गुड्स गॅरेजमध्ये चोर बीटी बियाणे आल्याची गुप्त माहिती वरोरा येथील कृषी विभागाला मिळाली. कृषी विभागाने पोलीस पथकाच्या मदतीने सदर गॅरेजवर धाड मारली. त्यात चोर बीटीची तब्बल १ हजार ३०० पॉकीट आढळून आले. त्याची किंमत ९ लाख ६२ हजार रूपये आहे. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक एम. जी. सोनटक्के, तालुका कृषी अधिकरी व्ही. आर. प्रकाश, कृषी पर्यवेक्षक आर. जी. उधाडे, पोलीस उपनिरीक्षक धीरज महाजन व त्याने सहकारी सहभागी झाले होते.उत्पादक कंपनीचा उल्लेख नाहीचोर बीटी बियाणे अमरावती येथील राठी गॅरेजमधून वरोरा येथील गॅरेजमध्ये पाठविण्यात आले. परंतु त्याची उचल कोण करणार त्याच्या नावाचा उल्लेख नाही. चोर बीटी बियाणांवर उत्पादक कंपनी, उत्पादनाची तारीख लॉट क्रमांक असा कुठेही उल्लेख नाही. चोर बीटी पॉकीटावर सूर्या व कोहीनूर असा फक्त उल्लेख आहे.तर बियाणे शेतकऱ्यांच्या हातात पडली असतीकृषी व पोलीस पथकाने धाड मारताना जराही विलंब केला असता तर १३०० चोर बीटी पॉकीट शेतकऱ्यांच्या हातात पडले असते. परत या हंगामात कापसाच्या गोंधळात भर पडली असती. चोर बीटी बियाणांचे पॉकीट जप्त करून पोलीस स्टेशन वरोरा येथे ठेवण्यात आले आहे. यामधील सहा पॉकीट गुणवत्ता तपासणीकरिता कृषी विभाग प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.सुटीचा दिवस निवडलासुटीचा दिवस पॉकीट पाठविण्याकरिता निवडला. १४ एप्रिल रोजी शनिवारला कार्यालय बंद राहतील, त्यातच दुसरा दिवस रविवार यामुळे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी या दोन दिवसात शहरात राहणार नाही. यासोबत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात राहतील, त्यामुळे चोर बीटी बियाणांची विल्हेवाट लावणे सुकर होईल, याकरिता सदर दिवसाची निवड केल्याची चर्चा केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती