शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

गंभीर! पाणी नसल्याने 'येथे' होत नाहीत तरुणांची लग्नं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 6:21 PM

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावात कुणी वधूपिता आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. यामागे तिथे पाण्याचा दुष्काळ असणे हे एक प्रमख कारण सांगितले जाते.

ठळक मुद्दे नळ बंद, विहिरीतील पाणी अयोग्य

चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावपर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे. अनेक भागांमध्ये नळच येत नाहीत. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. महिलांचा संपूर्ण दिवस पाणी गोळा करण्यात जातोय. त्यामुळे कोणीही इथल्या तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा कानाडोळा केला जातो, असा आरोप शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी एका प्रसिद्धपत्रकातून केला आहे.

गावात नळ नाही. टाकीत जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा जरी पुरवठा केला, तरी नळाला गढूळच पाणी येते. त्यामुळे गावातील लोकांना फिल्टर तसेच पाणी शुद्धीकरण मशीन बसवून जर पाणी शुद्ध करून दिले असते, तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळू शकते. पाण्याची समस्या सुटू शकते. पाणीटंचाईसोबतच या गावामध्ये सध्या अनेक सामाजिक प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत. पाणीच नसल्यामुळे या गावातल्या मुलांची लग्नं सध्या जुळत नाहीत. याचा पाठपुरावा सातत्याने इथले गावकरी करतात. मात्र पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारचा दिलासा या गावकऱ्यांना मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत तेथील महिलांना पाणी गोळा करावे लागते. त्यामुळे प्रशासनाने येथील गावकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी केली आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव गावातील पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. येथील महिलांना दिवसभर पाण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. महिलांची ही अवस्था पाहून येथील तरुणांना लग्नासाठी मुली द्यायला कोणीही तयार होत नाही. म्हणूनच येथील पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्याची गरज आहे.

- प्रा. शिल्पा बोडखे, पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता, शिवसेना

टॅग्स :water shortageपाणीकपात