धानाची कवडीमोल भावात विक्री

By Admin | Updated: December 11, 2014 23:05 IST2014-12-11T23:05:01+5:302014-12-11T23:05:01+5:30

भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी

Selling of cash is sold in vain | धानाची कवडीमोल भावात विक्री

धानाची कवडीमोल भावात विक्री

मोहाळी (नलेश्वर) : भाजप सरकार सत्तेत येण्यापुर्वी शेतकरी व सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखविण्यात आले. मात्र, कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाची कवडीमोल दराने खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. भाजप सरकारचे हेच का ‘अच्छे दिन’ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून आता धानाच्या राशी घरी येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अ दर्जाचे धान दोन हजार ते २१०० रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. गत वर्षी तीन हजार रुपयांपर्यत धानाचे दर वाढले होते. मात्र, यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ परिस्थिती, धान पिकांवर विविध रोगाची साथ व सततची नापिकी यामुळे धान उत्पादक शेतकरी वैतागलेला असताना, धानाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी पुर्णता खचला आहे.
मात्र लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेतेमंडळी स्थिर सरकार बनवण्याच्या व एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न केला जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, असे संबोधल्या जाते. शेतकरी सुखी तर जग सुखी असेही म्हटल्या जाते. मात्र, आजच्या स्थितीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे वास्तव बघितले तर जगाचा पोशिंदा खरोखरच सुखी आहे काय? याचा विचार न केलेला बरा.
शेतकऱ्यासारखा कर्जबाजरी या देशात कुणीच नाही. शेतकरी कर्जाच्या दलदलित जन्म घेतो व कर्जाच्या दलदलित मरतो, हे खर वास्तव आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी दुबार पेरणी तर कधी तिबार पेरणी, दिवसेंदिवस बी-बियाणांचे व रासायनिक खताचे तसेच किटकनाशकांचे भाव गगणाला भिडणारे, दिवसेंदिवस उत्पादनात घट तर कधी नापिकी, कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट, कधी उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा हैदोस तर कधी विविध रोगाची साथ या सर्व कालचक्रावर मात करुन धान उत्पादक शेतकरी आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी शेतात राबतो. पण त्याच्या नशिबी कुठले सुख आले. उलट दु:खाचे व कष्टाचे तसेच कर्जाचे डोंगर उभे आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर शासनाने वेळीच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अन्यथा आत्महत्या थांबणार नाही. (वार्ताहर)

Web Title: Selling of cash is sold in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.