शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: October 24, 2015 00:30 IST

जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शासकीय खरेदीला प्रारंभ नाही : तेलंगणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जातोय कापूस विक्रीलाचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी साधारणत: सव्वा लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या घरी कापसाची आवक सुरू झाली आहे. मात्र शासनाने अद्यापही कापूस खरेदीला प्रारंभ केला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होत आहे. मात्र या ठिकाणी कवडीमोल भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपयेच हमीभाव वाढवून शासनाने जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाची निराशा झाल्याचे शेतकरी सांगतात. कापसाचा उत्पादन खर्च जवळपास ६८०० रुपयाहून अधिक असून प्रति क्विंटल ४ हजार १०० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सध्या जिल्ह्यात वरोरा व माढेळी या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. कोरपना तालुक्यात एकमेव कापूस संकलन केंद्र कोरपना येथे असून अद्यापही केंद्राचे उद्घाटन झालेले नाही. वरोरा व माढेळी या ठिकाणी कापसाला जो भाव दिला जात आहे, तो शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे आर्थिक चणचण असलेले शेतकरी तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद तर काही शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत गावागावात काही खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहेत. साधारणत: ३८०० ते ३९०० रुपयात ही खरेदी केली जात आहे. कापसाचा प्रवास खर्च, मजूर आणि नगदी पैशामुळे शेतकरी गावातच कापूस विक्री करणे पसंत करीत आहे. असे असले तरी या विक्रीतून शेतकऱ्यांनाच प्रति क्विंटलमागे दीड हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. कापसाचे उत्पादन सप्टेंबर महिन्यापासून सुरु होते. त्याआधी कापूस खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. परंतु अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांकडील कापूस विक्री झाल्यानंतर कापूस केंद्र सुरु होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पणन महासंघाकडे आता शेतकरी पाठ फिरविताना दिसतात. यावर्षी कापसाची उतारी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे गावागावातील कापूस उत्पादनावरुन दिसून येत आहे. यातच तालुक्यात काही शेतशिवारात व्हायरल रोगाने उभी पिके जागीच वाळून गेली. त्यामुळे नदीपट्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून शासनानेही यासाठी पाहिजे ती मदत केली नाही. कापसाचे मोठे पिक घेणाऱ्या सोनुर्ली, बोरगाव, भोयगाव, कवठाळा, तळोधी, बाखर्डी आदी शेतशिवारात उत्पादन कमी आहे. कापसाच्या वेचनीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे तर काही गावात स्थानिक मजूर मिळत नसून अधिक मजुरीच्या लालसेपोटी मजुरांचे स्थानांतरण बाहेरगावी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे कापूस बऱ्याच शेतात वेचणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शासनाने हमीभावात वाढ करून शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित नियोजित गावात सुरु केल्यास शेतकऱ्यांचा वेळ, अंतर व आर्थिक खर्च वाचेल. तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)खासगी व्यापाऱ्यांचा कापूस जातोय मध्य प्रदेशातकाही खासगी कापूस खरेदीदार व्यापारी गावागावात जाऊन कापूस खरेदी करीत आहे. सदर कापसाची विक्री राज्याबाहेर मध्येप्रदेशातील सौसेर व पांदूर्णा कापूस संकलन केंद्रावर अधिक भावाने केली जात असल्याचे समजते.सोयाबीनचीही उतारी घसरलीयावर्षी पावसाचा अनियमितपणा व काही बियाण्याच्या फरकामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घसरण दिसत आहे. एकरी सात ते आठ क्विंटलच्यावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. यातच बाजारात ३९०० रु. खरेदीभाव असताना व्यापाऱ्यांकडून ३६०० ते ३७०० रुपयात प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे.शेतकऱ्यांची लूटकाही व्यापारी शेतकऱ्यांची गरज ओळखून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची लूट होताना दितस आहे.यावर आळा घालण्याची गरज आहे. मजुरांसाठी प्रवासाचा अधिक खर्चबऱ्याच गावात वेचणीसाठी मजूर नसल्याने आॅटो, छोटा हत्तीचे भाडे शेतकरी देत आहे. यामध्ये एका दिवशी ५०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावातील मजूर प्रवासखर्चाशिवाय वेचणीस तयार होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.