शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: October 24, 2015 00:30 IST

जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शासकीय खरेदीला प्रारंभ नाही : तेलंगणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जातोय कापूस विक्रीलाचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी साधारणत: सव्वा लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या घरी कापसाची आवक सुरू झाली आहे. मात्र शासनाने अद्यापही कापूस खरेदीला प्रारंभ केला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होत आहे. मात्र या ठिकाणी कवडीमोल भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपयेच हमीभाव वाढवून शासनाने जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाची निराशा झाल्याचे शेतकरी सांगतात. कापसाचा उत्पादन खर्च जवळपास ६८०० रुपयाहून अधिक असून प्रति क्विंटल ४ हजार १०० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सध्या जिल्ह्यात वरोरा व माढेळी या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. कोरपना तालुक्यात एकमेव कापूस संकलन केंद्र कोरपना येथे असून अद्यापही केंद्राचे उद्घाटन झालेले नाही. वरोरा व माढेळी या ठिकाणी कापसाला जो भाव दिला जात आहे, तो शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे आर्थिक चणचण असलेले शेतकरी तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद तर काही शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत गावागावात काही खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहेत. साधारणत: ३८०० ते ३९०० रुपयात ही खरेदी केली जात आहे. कापसाचा प्रवास खर्च, मजूर आणि नगदी पैशामुळे शेतकरी गावातच कापूस विक्री करणे पसंत करीत आहे. असे असले तरी या विक्रीतून शेतकऱ्यांनाच प्रति क्विंटलमागे दीड हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. कापसाचे उत्पादन सप्टेंबर महिन्यापासून सुरु होते. त्याआधी कापूस खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. परंतु अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांकडील कापूस विक्री झाल्यानंतर कापूस केंद्र सुरु होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पणन महासंघाकडे आता शेतकरी पाठ फिरविताना दिसतात. यावर्षी कापसाची उतारी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे गावागावातील कापूस उत्पादनावरुन दिसून येत आहे. यातच तालुक्यात काही शेतशिवारात व्हायरल रोगाने उभी पिके जागीच वाळून गेली. त्यामुळे नदीपट्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून शासनानेही यासाठी पाहिजे ती मदत केली नाही. कापसाचे मोठे पिक घेणाऱ्या सोनुर्ली, बोरगाव, भोयगाव, कवठाळा, तळोधी, बाखर्डी आदी शेतशिवारात उत्पादन कमी आहे. कापसाच्या वेचनीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे तर काही गावात स्थानिक मजूर मिळत नसून अधिक मजुरीच्या लालसेपोटी मजुरांचे स्थानांतरण बाहेरगावी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे कापूस बऱ्याच शेतात वेचणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शासनाने हमीभावात वाढ करून शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित नियोजित गावात सुरु केल्यास शेतकऱ्यांचा वेळ, अंतर व आर्थिक खर्च वाचेल. तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)खासगी व्यापाऱ्यांचा कापूस जातोय मध्य प्रदेशातकाही खासगी कापूस खरेदीदार व्यापारी गावागावात जाऊन कापूस खरेदी करीत आहे. सदर कापसाची विक्री राज्याबाहेर मध्येप्रदेशातील सौसेर व पांदूर्णा कापूस संकलन केंद्रावर अधिक भावाने केली जात असल्याचे समजते.सोयाबीनचीही उतारी घसरलीयावर्षी पावसाचा अनियमितपणा व काही बियाण्याच्या फरकामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घसरण दिसत आहे. एकरी सात ते आठ क्विंटलच्यावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. यातच बाजारात ३९०० रु. खरेदीभाव असताना व्यापाऱ्यांकडून ३६०० ते ३७०० रुपयात प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे.शेतकऱ्यांची लूटकाही व्यापारी शेतकऱ्यांची गरज ओळखून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची लूट होताना दितस आहे.यावर आळा घालण्याची गरज आहे. मजुरांसाठी प्रवासाचा अधिक खर्चबऱ्याच गावात वेचणीसाठी मजूर नसल्याने आॅटो, छोटा हत्तीचे भाडे शेतकरी देत आहे. यामध्ये एका दिवशी ५०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावातील मजूर प्रवासखर्चाशिवाय वेचणीस तयार होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.