शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘त्या’ वाघाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:35 IST

मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्देवन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न : वाघ बघण्यासाठी नागरिकांचा आटापिटा

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. कुणी भिंतीवर, कुणी घराच्या स्लॅबवर अथवा चक्क झाडांवर चढून वाघाला पाहण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांनी वाघाच्या विविध मुद्रा मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नागरिकांना हैराण करणाऱ्या वाघाला जंगलात हाकलण्यासाठी वनविभागाचे पथक आटापिटा करीत आहेत.वनविभागाकडून हाकलून दिल्यावरही वाघ पुन्हा त्याच ठिकाणी येवून बस्तान मांडत आहे. त्यामुळे या वाघाने शहरातील नागरिकांची झोप उडविली आहे. दोन हेक्टर परिसरात वास्तव्यास असलेल्या हा वाघ सुरक्षित जागेच्या शोधात आहे. आयुध निर्माणी येथील पिनाका प्रकल्पाच्या दिशेने जावून पुन्हा पण परत येतो. गौतमनगर परिसरातील झुडूपांमध्ये गावठी डूकरे मोठ्या संख्येने आहेत. परिणामी वाघाचा या परिसरात मुक्काम वाढत असावा, अशी चर्चा आहे. वनविभागाच्या पथकाने वाघाला हाकलून लावण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. हा वाघ ताडाळी येथून सारवाही परिसरात आला होता. दरम्यान म्हातारदेवीच्या दिशेने गेला. सारवाही परिसरातून धारिवाल कंपनीची सुरक्षा भिंत, कोंढाळी तलाव, रेल्वे ट्रॅकमार्गे इंजिनिअरिंग कॉलेज जवळील नाल्याजवळ पुलाच्या सहाय्याने मोहबळा शेतात आला. तिथून पुन्हा आयुध निर्माणी परिसरात पोहोचल्याचे काही नागरिक सांगतात. तेव्हापासून हा वाघ या भागात बस्तान मांडून आहे. वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही जंगलात हाकलून लावण्यास अपयश आले. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी नागरिक आटापिटा करीत आहेत.वाघाच्या दहशतीमुळे आयुध निर्माणीने मार्ग बदलविलावाघाल जंगलात हाकलून लावण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पण अजुनही यश आले नाही. परिणामी, शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत आहेत. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी रविवारीदेखील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. आयुध निर्माणीच्या मार्गावरून नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे व्यवस्थापाने या मार्गात बदल केला आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पायी किंवा वाहनाने जाण्यासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.