शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

‘त्या’ वाघाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 21:35 IST

मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्देवन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न : वाघ बघण्यासाठी नागरिकांचा आटापिटा

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. कुणी भिंतीवर, कुणी घराच्या स्लॅबवर अथवा चक्क झाडांवर चढून वाघाला पाहण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांनी वाघाच्या विविध मुद्रा मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नागरिकांना हैराण करणाऱ्या वाघाला जंगलात हाकलण्यासाठी वनविभागाचे पथक आटापिटा करीत आहेत.वनविभागाकडून हाकलून दिल्यावरही वाघ पुन्हा त्याच ठिकाणी येवून बस्तान मांडत आहे. त्यामुळे या वाघाने शहरातील नागरिकांची झोप उडविली आहे. दोन हेक्टर परिसरात वास्तव्यास असलेल्या हा वाघ सुरक्षित जागेच्या शोधात आहे. आयुध निर्माणी येथील पिनाका प्रकल्पाच्या दिशेने जावून पुन्हा पण परत येतो. गौतमनगर परिसरातील झुडूपांमध्ये गावठी डूकरे मोठ्या संख्येने आहेत. परिणामी वाघाचा या परिसरात मुक्काम वाढत असावा, अशी चर्चा आहे. वनविभागाच्या पथकाने वाघाला हाकलून लावण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. हा वाघ ताडाळी येथून सारवाही परिसरात आला होता. दरम्यान म्हातारदेवीच्या दिशेने गेला. सारवाही परिसरातून धारिवाल कंपनीची सुरक्षा भिंत, कोंढाळी तलाव, रेल्वे ट्रॅकमार्गे इंजिनिअरिंग कॉलेज जवळील नाल्याजवळ पुलाच्या सहाय्याने मोहबळा शेतात आला. तिथून पुन्हा आयुध निर्माणी परिसरात पोहोचल्याचे काही नागरिक सांगतात. तेव्हापासून हा वाघ या भागात बस्तान मांडून आहे. वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही जंगलात हाकलून लावण्यास अपयश आले. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी नागरिक आटापिटा करीत आहेत.वाघाच्या दहशतीमुळे आयुध निर्माणीने मार्ग बदलविलावाघाल जंगलात हाकलून लावण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पण अजुनही यश आले नाही. परिणामी, शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत आहेत. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी रविवारीदेखील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. आयुध निर्माणीच्या मार्गावरून नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे व्यवस्थापाने या मार्गात बदल केला आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पायी किंवा वाहनाने जाण्यासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.