शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ३० मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.८२ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ९७४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली.

ठळक मुद्देगोंडपिपरी तालुका अव्वल : जिल्ह्याचा निकाल ९०.६० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९०.६० टक्के लागला. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी महक प्रकाश उके ही ९८.४६ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाची साक्षी अरुण कुंभारे ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ९४.४६ टक्के गुण घेत द्वितीय आली आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रथम अमरदीप लोखंडे हा ९४ टक्के घेऊन तिसऱ्या स्थानी आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ७४३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २६ हजार ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.एकूण एक हजार २१९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. सात हजार ४८२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १५ हजार ८६९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ४८१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.विदर्भाचा निकाल बघितला तर चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा विदर्भात पाचव्या क्रमांकावर होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली आहे. ही बाब जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आहे.पुन्हा एकदा मुलीच अव्वलमागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ३० मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.८२ आहे. यासोबतच एकूण १३ हजार ९७४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ९१५ मुलींनी परीक्षा दिली. यातून १३ हजार १२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९३.५१ आहे.विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिकमागील वर्षी वाणिज्य शाखेने निकालात बाजी मारली होती. मात्र यावर्षी बारावी परीक्षेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतून एकूण ११ हजार ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ११ हजार ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातून १० हजार ८१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ७२५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून तीन हजार ५५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेची टक्केवारी ९७.९६ आहे. कला शाखेतून एकूण १४ हजार १९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १३ हजार ९१० विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी ११ हजार ८६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ८५.३१ आहे. वाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील दोन हजार २२५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी दोन हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.०१ आहे. तर एमसीव्हीसी (व्होकेशनल) प्रकारातून एक हजार ५९२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील एक हजार ५७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ३३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ८५.२२ इतकी आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडीजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती, गोंडपिपरी, कोरपना, सावली, मूल, नागभीड, पोंभूर्णा या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. त्या तुलनेत भद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरा या शहरी भागातील मुले निकालात मागे पडली आहे.जिल्ह्यातील ५८ शाळांचा निकाल १०० टक्केमागील वर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८०.८९ टक्के लागला होता. मात्र यावर्षी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदा ९०.६० टक्के निकाल लागला. विशेष म्हणजे तालुक्यांसह अनेक महाविद्यालयांनीही यंदा चांगला निकाल दिला आहे. जिल्ह्यात एकूण ५८ महाविद्यालयांनी यावर्षी १०० टक्के निकाल दिला आहेचिमूर तालुका माघारलायंदाच्या बारावी परीक्षेच्या निकालात गोंडपिपरी तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला. जिवती तालुका (९४.३१ टक्के ) दुसºया तर चिमूर तालुका ८५.७९ टक्के घेऊन पिछाडीवर गेला आहे. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल