शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सरपंच लागले विकास आराखडा बनविण्याच्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:50 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मासळ बु. : मासळ ग्रामपंचायतीवर आता नव्यानेच कारभारी निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मासळ बु. : मासळ ग्रामपंचायतीवर आता नव्यानेच कारभारी निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. त्यामुळे नवीन आराखड्यात घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, पाणी योजनेसाठी सोलर वीज पंप, कुषोषणमुक्ती, शाळांचे शौचालय, गावातील बोलक्या भिंती यासारख्या उपाययोजनांचा समावेश होणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक उपाययोजनेवर भर देणे फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती दरवर्षी ‘आमचं गाव आमचा विकास’ या अंतर्गत पुढील वर्षाचा विकास आराखडा तयार करतात. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आराखड्याला निधी कमी प्रमाणात उपलब्ध झाला होता; मात्र आता काही प्रमाणात राज्यातील परिस्थिती सुधारल्याने अनेक प्रकारच्या योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीला चांगल्याप्रकारे निधी मिळणार आहे तसेच ग्रामपंचायतींना केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. या निधीचा वापर योग्य व चांगल्याप्रकारे होण्यासाठी या आराखड्यात विकासकामांचे नियोजन केले जाते.

ग्रामपंचायतीचा गाव विकास आराखडा तयार करताना २५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण व उपजीविका, १० टक्के निधी महिला व बालकल्याण व उर्वरित निधी गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती - जमाती कल्याण उपक्रमावर खर्च करता येतो. दहा टक्केपेक्षा अधिक निधीचा वापर वैयक्तिक लाभाच्या उपक्रमावर करता येत नाही. येत्या पंधरा दिवसात हा आराखडा आता ई - ग्रामस्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.