शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

यांत्रिकीकरणात हरवली सर्जा-राजाची जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो,

ठळक मुद्देपोळ्याची गंमत हरवली : पशुपालनाकडे वळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्षभर खांद्यावर भार वाहणाऱ्या बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा करतो. पण नापिकी, ओला दुष्काळ यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबतच २१ व्या शतकात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परिणामी सर्जा राज्याची जोडी कमी झाल्याचे दिसत आहे.पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो, त्याच्या शिंगाला बाशिंग तर अंगावर विशिष्ट आकाराचा झूल टाकून त्याला सजवतो. त्यानंतर वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढतो. गावातील मंदिराला प्रदक्षिणा घालून त्याचे ओक्षण करून पुरणपोळी खायला घालतो. यावेळी परिसरातील नागरिकही पूजा करतात. परंतु नापिकीमुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न परिणामी बैल पोसणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. तसेच यांत्रिकीकरणाची अनेक साधने तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी सर्जा-राजाची जोडी आता कमी होत आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही या जोडीनेच शेती केली जात आहे.गुराखीच मिळेना !पूर्वी जनावरे राखण्यासाठी मोठया प्रमाणात गुराखी मिळत असत. त्यांना शेतकरी पीक निघाल्यानंतर धान्य देत असत. मात्र आता त्यावर भागत नसल्याने जनावरे जंगलात चराईसाठी नेण्यासाठी गुराखीच मिळत नाही. परिणामी जनावरे चाराईसाठी नेण्याचा मोठा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.दुधाळ जनावरांकडे कलपूर्वी शेतकऱ्याकडे मोठया प्रमाणात जनावरे होती. जनावरांच्या संख्येवरून शेतकऱ्याची श्रीमंती ठरवली जायची. लग्न कार्य ठरवताना किती जनावरे आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र आता वैरणाचा प्रश्न, चाऱ्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती यामुळे शेतकऱ्यांना जनावरे पोसणे कठीण झाले आहे. याउलट दूधाळू जनावरामुळे दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ जसे पनीर यासारखे विकायला मिळत असल्याने दूधाळू म्हणजेच गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे पालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक