शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोल बाजारातील अतिक्रमणामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. येथे दररोज भाजीबाजारही ...

चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अकारण अरुंद होऊन या रस्त्यावरून वाहन काढताना त्रास होत आहे. मनपाने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेने

नागरिक त्रस्त

चिमूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णत: उखळले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरोली मार्गावर

गतिरोधक तयार करा

मूल : मूल ते गडचिरोली मार्गावरील चौक परिसरात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वरोऱ्यात मोकाट जनावरांचा हैदोस

वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरांचा मृत्यू झाला होता. जनावरांमुळे वाहनांचेही अपघात झाले आहेत. वरोरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील आनंदवन चौकातही मोठ्या प्रमाणात जनावरांचा ठिय्या असतो. त्यामुळे रहदारीला अडचणी येत आहे.

मोकाट कुत्र्यांचा

बंदोबस्त करावा

राजुरा : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यामध्ये कुत्रे उभे राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घाणीच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : बाबूपेठ वार्डात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. नाल्या तुडुंब भरल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढले. रस्त्यावर घाण साचली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

वळण रस्त्यावर रेडियम पट्ट्या लावा

कोरपना : शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- आदिलाबाद वणी मार्गावरील वळण रस्ते धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. रस्ता सुरक्षेसाठी रेडियम पट्ट्या लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कचरा पेट्यांची

संख्या वाढवावी

ब्रह्मपुरी : शहराची लोकसंख्या वाढली. परंतु, त्यामानाने वार्डनिहाय कचरा पेट्या लावण्यात आल्या नाही. त्यामुळे बरेच जण रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकार टाळण्यासाठी कचरा पेट्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.