शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

गोल बाजारातील अतिक्रमणामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST

चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. येथे दररोज भाजीबाजारही ...

चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अकारण अरुंद होऊन या रस्त्यावरून वाहन काढताना त्रास होत आहे. मनपाने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेने

नागरिक त्रस्त

चिमूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णत: उखळले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरोली मार्गावर

गतिरोधक तयार करा

मूल : मूल ते गडचिरोली मार्गावरील चौक परिसरात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वरोऱ्यात मोकाट जनावरांचा हैदोस

वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरांचा मृत्यू झाला होता. जनावरांमुळे वाहनांचेही अपघात झाले आहेत. वरोरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील आनंदवन चौकातही मोठ्या प्रमाणात जनावरांचा ठिय्या असतो. त्यामुळे रहदारीला अडचणी येत आहे.

मोकाट कुत्र्यांचा

बंदोबस्त करावा

राजुरा : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यामध्ये कुत्रे उभे राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

घाणीच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : बाबूपेठ वार्डात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. नाल्या तुडुंब भरल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढले. रस्त्यावर घाण साचली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

वळण रस्त्यावर रेडियम पट्ट्या लावा

कोरपना : शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- आदिलाबाद वणी मार्गावरील वळण रस्ते धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. रस्ता सुरक्षेसाठी रेडियम पट्ट्या लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कचरा पेट्यांची

संख्या वाढवावी

ब्रह्मपुरी : शहराची लोकसंख्या वाढली. परंतु, त्यामानाने वार्डनिहाय कचरा पेट्या लावण्यात आल्या नाही. त्यामुळे बरेच जण रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकार टाळण्यासाठी कचरा पेट्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.