ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था

By Admin | Updated: December 15, 2014 22:54 IST2014-12-15T22:54:06+5:302014-12-15T22:54:06+5:30

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने

Roads in rural areas | ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनावस्था

सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांचीे कामे तातडीने करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकारम विभाग व लोकप्रतिनिधीकडे करण्यात आली आहे.
राजुरा तालुक्यात वेकोलिच्या विविध कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीमुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होते. त्यामुळे परिसरातील रस्ते नेहमीच खराब होतात. या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वेकोलिही दुर्लक्ष करीत आहे.
राजुरा तालुक्यातील साखरी गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांचीही अशीच अवस्था झाली आहे. यात साखरी- निमनी, साखरी- धिडशी, साखरी- हिरापूर, मार्ड-कुर्ली, निर्ली- चार्ली, साखरी- पेल्लोरा पांदन या रस्त्यांचा समावेश आहे. सदर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या मार्गावरुन परिसरातील नागरिक, शेतकरी आवागमन करतात. शेतातील माल आणण्यासाठीही शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
वेकोलिमुळे परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र वेकोलिने नागरिकांच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. वेकोलिमुळे परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी संघर्ष युवा विकास मंडळाने केली आहे.(वार्ताहर)

Web Title: Roads in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.