शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

डांबर कंपन्यांच्या शटडाऊनमुळे राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:02 PM

मंजूर बांधकामे मार्च एडींगमध्ये पूर्ण करण्याची प्रशासकीय घाई सुरू असताना शासन अंगीकृत एचपीसीएल व बीपीसीएल कंपन्यांनी क्लिनिंगसाठी शटडाऊन केले. यामुळे डांबर पुरवठा बंद झाला असून राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थानांही फटकापुरवठा ठप्प

राजेश मडावीचंद्रपूर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्यात ३ हजार ९०० किमी पेक्षा अधिक लांबीचे रस्ते बांधकामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर दुसरीकडे सर्वजनिक बांधकाम विभागानेही निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील शेकडो किमी रस्त्यांची कामे हाती घेतली. मंजूर बांधकामे मार्च एडींगमध्ये पूर्ण करण्याची प्रशासकीय घाई सुरू असताना शासन अंगीकृत एचपीसीएल व बीपीसीएल कंपन्यांनी क्लिनिंगसाठी शटडाऊन केले. यामुळे डांबर पुरवठा बंद झाला असून राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक लागला आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १ हजार ९०० किमी अंतराचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट राज्याला मिळाले होते. यापैकी ८९१ किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले. याशिवाय केंद्राने १ हजार ९ किमी अंतराचे महामार्ग बांधकामासाठी मंजूरी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या जिल्ह्यांमध्ये तालुका व जिल्हास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे कामे सुरू केली. याकरिता खडी व डांबरचा वापर केला जातो. रस्ते बांधकामासाठी खासगी कंपन्यांकडून डांबर विकत घेण्याला केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मनाई केली आहे. यामुळे केंद्र शासन अंगीकृत एचपीसीएल (हिंदूस्थान पेट्रोलियम कार्पोशन कंपनी लि.) आणि बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कार्पोशन कंपनी लि.) या दोन कंपन्यांकडूनच राज्य सरकाराला डांबर खरेदी करावी लागते. मार्च एडींग लक्षात घेऊ न बांधकाम विभागाने राज्यातील गावखेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सुरू केली. शिवाय, जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगरपरिषदांकडून रस्त्यांची कामे केली जात आहे. मात्र, डांबर उत्पादक कंपन्यांनी याच महिन्यात अचानक शटडाऊन केल्याने पुरवठा ठप्प झाला. परिणामी, डांबरअभावी राज्यातील शेकडो किमी रस्त्यांची कामे ठप्पे झाली. चंद्रपुरातीलही रस्ते बांधकाम थंडावल्याचे दिसून येत आहे.अधिकारी गुंतले निवडणुकीतसार्वजनिक बांधकाम विभागातील शेकडो अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लोकसभा निवडणुकीसाठी झाल्या आहेत. सध्या निवडणूक आयोगाकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कामे सुरू आहेत. डांबर पुरवठा होत नसल्याने कामे ठप्प असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना मान्य केले. पण आचारसंहिता असल्याने सांगून यावर अधिक बोलण्यास नकार दिला.रस्त्यांच्या किंमती वाढणारज्या रस्त्यांची बांधकामे सुरू आहेत. याचा आचारसंहितेशी काही संबंध नाही. ही कामे मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. यामुळे विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण, डांबर नसल्याने कामे थंडावली. यावर तोडगा निघाला नाही तर रस्त्यांच्या किंमती वाढून आर्थिक फटका बसेल. अधिकारी हे मान्य करणार का, याची भीती आहे.-शंकर किरणापुरे, कंत्राटदार, चंद्रपूर

टॅग्स :Governmentसरकार