शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

२२६ वनहक्क प्रकरणांची पुनर्विलोकन प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 12:50 PM

सद्यस्थितीत २२६ पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाखरीप हंगामासाठी कर्ज मिळण्याचे मार्ग बंद

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील २२६ दाव्यांची तहसील व उपविभागीय समितीने पडताळणी केल्यानंतर त्रुटी आढळल्या होत्या. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाला मंजुरी दिली होती. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने मालकी हक्काअभावी आदिवासी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकेकडून पीक कर्ज घेण्याचे मार्ग बंद झाले आहेत.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासींनी कलम ३ (१) नुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४ हजार १२ वैयक्तिक दाव्यांना जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ४ हजार ९६१. ८१ हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना शेती करण्याचा अधिकार मिळाला. यामध्ये चंद्रपूर उपविभागात १५२.४२ हेक्टर, बल्लारपूर २९३.४१, मूल ११२.०८, गोंडपिपरी ४१८.७८, वरोरा ३३५.०८, चिमूर ३८९.२२ , ब्रह्मपुरी ४३१.५३ आणि राजुरा उपविभागात सर्वाधिक २८२९.२९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. तालुका, उपविभाग आणि जिल्हा समितीने प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्यासाठी जनरेट्यामुळे लक्ष दिल्याने लाभार्थ्यांना सदर जमिनीचा सातबाराही वाटप करण्यात आला. २८२९.२९ हेक्टर जमीन ताब्यात असणाऱ्या वनहक्क लाभार्थ्यांकडून कुणालाही हस्तांतरीत करता येत नाही. शिवाय, सातबारावर शासकीय विभागाचा उल्लेख असल्याने गतवर्षी खरीप हंगामादरम्यान राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी वनहक्क दावे मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज देण्याचे निर्देश जारी केले. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना मागील हंगामात पीक कर्ज घेता आले. सद्यस्थितीत २२६ प्रकरणे प्रलंबित आहेत. पुराव्यांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा समितीने पुनर्विलोकनाचीही तयारी केली. परंतु, लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.विभागीय आयुक्तांकडे मागता येणार दादभारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ मे २०२१ रोजी एका अधिसूचनेद्वारे वनहक्क कायद्याच्या कलम ६ मध्ये सुधारणा केली. त्यानुसार जिल्हा समितीने दावा नामंजूर केल्यास आता विभागीय आयुक्तांकडे पेसा क्षेत्रातील आदिवासींना दाद मागता येणार आहे. यापूर्वी तालुका, उपविभाग व जिल्हा समिती अशी त्रिस्तरीय रचना होती. या समित्यांनी दावा फेटाळल्यास दाद मागण्याचा मार्गच बंद करण्यात आला होता.

टॅग्स :agricultureशेती