शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दाव्या-प्रतिदाव्यात रंगला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:25 AM

मूल : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात लढत असली तरी ...

मूल : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे काँग्रेस व भाजप या दोन पक्षात लढत असली तरी तिसरी आघाडी व इतर पक्षांच्या उमेदवारांनी या दोन्ही पक्षाला काही प्रमाणात रोखण्यास यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपने २२ तर काँग्रेसने २४ ग्रामपंचायतींवर दावा केला. राजकीय वर्चस्वासाठी दावे- प्रतिदावे अजूनही सुरूच आहेत.

आघाडी असलेल्या ग्रामपंचायतीवर आपले समर्थन असल्याची कबुली यावेळी प्रसारमाध्यमाला दिली. यात पहिल्यांदाच शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी व युवा परिवर्तन आघाडीने घेतलेला विजयदेखील चर्चेचा विषय ठरला आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोडेबाजार वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा. सा. कन्नमवार यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. यापूर्वी काँग्रेसची पकड या तालुक्यात होती. मात्र, मतभेदांचा फायदा घेत माजी आमदार शोभा फडणवीस यानी आपला दबाव निर्माण केला. ३० वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. या तालुक्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामांबाबत नाव चर्चिले जाते. गावची निवडणूक म्हटली की त्यात पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्याचाच प्रत्यय ग्रामपंचतीच्या निकालावरून आला. गावागावात आपसी मतभेदांमुळे एकाच पक्षाचे उमेदवार एकमेकाविरोधात उभे ठाकल्याने मते विखुरली गेली. त्याचा परिणाम पराभव होण्यास झाला असल्याचे दिसून आले. यात भाजपा असो की काँग्रेस या परीक्षेतून पक्षाला जावे लागल्याचे दिसून येते. आपसातील मतभेदाचा फायदा या निवडणुकीत ८ गावात युवा परिवर्तन आघाडी, शिवसेना, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे दिसून आले. तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तारूढ असलेल्या पक्षाला जनतेने नाकारत सत्तापरिवर्तन घडवून आणले. भाजपा २२ तर काँग्रेस २४ ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ज्या पक्षाकडे राखीव गटाचा उमेदवार नसल्यास मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी भाजपा व काँग्रेसने केलेले दावे सत्यात उतरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.