‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:58 IST2017-07-21T00:58:31+5:302017-07-21T00:58:31+5:30

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर

Response to the campaign 'I have not been forgiven by my debt' | ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ मोहिमेला प्रतिसाद

विजय वडेट्टीवार : सावली येथे शेकडो शेतकऱ्यांनी भरले अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सभागृहात आणि रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी लावून धरली. काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन ‘चांदा ते बांदा’ संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे शासनाने दखल घेत दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र या कर्जमाफीचा अद्यापही शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ असे अर्ज आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांनी भरले.
काँग्रेसने ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सावली येथून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळाचे उपगट नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रसेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रेद्वारे राज्यभर फिरून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे ११ सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, असे सांगितले. मात्र दहा हजारांची उचल देण्याच्या निर्णयात अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध सुरू आहे. सरकारने त्या अटी मागे घेतल्या. पण, प्रत्यक्षात आजपर्यंत राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ हजार ८२ शेतकऱ्यांना दहा हजारांची उचल मिळाली आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी २४ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली व दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे शासन सांगत आहे. मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कर्जमाफीचे जिल्हानिहाय आकडे जाहीर केले. मात्र सरकारचे आकडे फसवे असून कर्जमाफीचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे आ. वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी सावली तालुकाध्यक्ष राजेश सिध्दम, माजी सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष रजनी भडके राकेश गड्डमवार, नंदा अल्लूरवार, वैशाली शेरकी, विजय कोरेवार, मनिषा जवादे, संगीता चौधरी, उर्मीला तरारे, उषा भोर, विलास यासलवार, छत्रपती गेडाम आदी उपस्थित होते.

Web Title: Response to the campaign 'I have not been forgiven by my debt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.