शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:30 PM

काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर महानगरातील भानापेठ प्रभागातील पीएच नगर परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व नालीचे बांधकामाच्या भूमिपूजन व भानापेठ मधील माता मंदिर परिसरातील अन्य एका रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे आदी उपस्थित होते.भानापेठ परिसरातील पीएच नगरात ११० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. तसेच या ठिकाणी २०० चौरस मीटर परिसरात एका बगीच्याचे देखील सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच भानापेठ क्रमांक ११ मधीलच माता मंदिर परिसरातील भूमीगत नाली व रस्त्याचे ३० लाख रुपयांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी उर्वरित कामांसाठी निवेदने दिलीत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या मिशनची माहिती दिली. आपल्या वार्डातील व परिसरात गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या नागरिकांसाठी दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य उपलब्ध करणारे मिशन दिनदयाल सुरू करण्यात आले आहे. जे गरीब असतील त्या सर्वांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. अशा सर्व नागरिकांची माहिती गोळा करणे नगरसेवकाला माहिती देणे या कामातही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन सेवा, मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मिशन मंथनच्या माध्यमातून १०० आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर रस्ते करावेत, अशी सूचना महापौर घोटेकर यांना दिल्या. संचालन उमा कुकुडवाड यांनी केले.