शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प

By admin | Updated: June 22, 2016 01:18 IST

मागील बऱ्याच वर्षापासून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग,

सुधीर मुनगंटीवार : राष्ट्रीय जबाबदारी समजून घेण्याचे आवाहनचंद्रपूर : मागील बऱ्याच वर्षापासून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग, वातावरणातील बदल अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यावर मात करण्याकरिता व पर्यावरण संतुलन ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तसेच या वृक्षांचा सांभाळ करण्याकरिता जनसहभागाची आवश्यकता आहे. राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणण्यासंदर्भात येत्या १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा सर्व शासकीय यंत्रणेनी राष्ट्रीय जबाबदारी समजून वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज वने मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाची १ जुलै २०१६ रोजी राज्यात करण्यात येणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, आमदार समीर कुनावार, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार, सचिव (वने) विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त सचिन कुर्वे, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, तीन वर्षात राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून वृक्ष लागवड हे शासकीय काम असे समजून न करता प्रत्येकाने आपले जीवन मूल्य समजून करावे. वृक्ष लागवडीसाठी देशातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांनी २५ हजार वृक्ष लागवड करणार असल्याचे व सिने कलावंत नाना पाटेकर, विवेक ओबेराय असे मोठे उद्योजक येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)