शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माणिकगड किल्ल्याची दुरुस्ती करा

By admin | Updated: November 8, 2014 01:02 IST

वृक्षांनी नटलेल्या पर्वतरांगा धुक्याची मंद झालर अन् पाखरांच्या मुंंजळ स्वरांनी मनाला पडणारी भुरळ...

जिवती : वृक्षांनी नटलेल्या पर्वतरांगा धुक्याची मंद झालर अन् पाखरांच्या मुंंजळ स्वरांनी मनाला पडणारी भुरळ... सुर्यस्ताने विहगंम दृष्य या साऱ्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला माणिकगड किल्ला येथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करुन टाकते. मात्र अलिकडे येथे अनेक समस्या निर्माण झाल्याने पर्यटकांनी पाठ दाखविली आहे.आंध्र-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला आहे. आजुबाजुनी निसर्गाने रमलेला स्थळ मनाचा थकवा दूर करते. अप्रतिम सांैदर्यात पर्यटकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ येथील माणिकगड किल्ल्यात आहे. मुख्य रस्त्याच्या पूर्व व खालच्या बाजुला २०० मिटर अंतरावर हेमाडपंथी विष्णूचे मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीगृहातून पाहिल्यास हा परिसर विलोभनीय वाटतो. निर्सगाने नटलेला हा परिसर डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक येतात. मात्र येथे पाहिजे त्या प्रमाणात सोयी-सुविधा नसल्याने काहीसे हिरमसुले होऊन परतात. गडचांदूर जिवती या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर हा किल्ला आहे. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली, पर्यटक, भाविक मंडळीची मोठी गर्दी असते. दरवर्षी या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम घेतला जातो. माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असला तरी येथे फासशा सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. माणिगकड किल्ल्यावरील वाढत्या भेटी लक्षात घेता या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणार का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.किल्ल्यालगतच असलेल्या अंमलनाला धरणामुळे येथील शेतकरी आनंदीत झाला होता. मात्र शासनाने त्या धरणाचे पाणी सिमेंट कंपनीला पुरवित असल्याने शेतकऱ्यांना निराश व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांपेक्षा धरण सिमेंट कंपनीलाच जीवनदायी ठरला आहे. त्याचबरोबर या परिसराला लाभलेली नैसर्गिक वनसंपदा धरणाच्या सौदर्यात आणखी भर ठाकत आहे. पण त्याचबरोबर धरणाच्या कठड्यावर बसून सुर्यास्ताने होणारे दर्शन तर एक अनोखी पर्वणीच आहे. त्यामुळे परिसराला पर्यटनदृष्टया एक आगळे वेगळे महत्त्व झाले आहे. या धरणावर पर्यटकांच्या विसाव्यासाठी विश्रामगृहाची सोय नाही. जलविहारासाठी नौका नाही याकडे संबंधितांनी तातडीने लक्ष पर्यटकांसाठी सुख सोयी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)