३१ ऑगस्टपर्यंतच्या जमावबंदीत दुकानदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:30+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ म्हणजे एक तास वाढविण्यात आली. हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू राहिल.

Relief for shopkeepers in the curfew till August 31 | ३१ ऑगस्टपर्यंतच्या जमावबंदीत दुकानदारांना दिलासा

३१ ऑगस्टपर्यंतच्या जमावबंदीत दुकानदारांना दिलासा

ठळक मुद्देकलम १४४ लागू । अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर निघण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ म्हणजे एक तास वाढविण्यात आली. हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू राहिल. लग्न समारंभ तसेच अंत्यविधीला केवळ ५० व्यक्ती उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
परराज्यात, राज्यतंर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल. परवानगीशिवाय नागरिकांनी जिल्ह्याबाहेर, परराज्य व परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. प्रवास केल्यानंतर १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणात राहावे लागेल. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, अधिकारी व संबंधित व्यक्तींशिवास इतर व्यक्तींना रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत प्रतिबंध सार्वजनिक ठिकाणी निघता येणार नाही. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येता येणार नाही.

जीवनावश्यक दुकाने सुरू
अत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध, दुग्धोत्पादन फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील. जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्याची किरकोळ विक्री सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.
कृषी दुकानांनाही परवानगी
कृषी, कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषत: कापूस, तूर व धान खरेदी, विक्री आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्यास परवागनी देण्यात आली. उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना व दुकाने सोमवारी ते रविवारी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत सुरू राहतील.
बाहेरचे कामगार आणण्यास प्रतिबंध
सर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहती, युनिट बांधकाम सुरू राहतील. परंतु बांधकाम कामगाराला बाहेरून आणण्यास परवानगी नाही.
१०० कर्मचारी उपस्थिती
सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळ कार्यालय १०० टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजमधील कार्यालय, कर्मचारी अध्यापन व्यतिरिक्त ई-लर्निंग कन्टेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीला परवानगी आहे.
जिम्नॅस्टिक्सला मुभा
मैदानी बिगर संघीय खेळ जसे गोल्फ कोर्स, आउटडोर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या क्रीडांना ५ ऑगस्टपासून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याशिवाय सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केस कर्तनालये सायकांळी ६ वाजेपर्यंत सुरु राहतील.
मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स
मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत सुरू राहतील. मात्र कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, रेस्टॉरंट सुरू ठेवता येणार नाही. रेस्टॉरंट किचनमधून होम डिलिव्हरी सुरू ठेवता येतील.

Web Title: Relief for shopkeepers in the curfew till August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.