शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अतिरिक्त शिक्षकांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे.

ठळक मुद्देसंच मान्यता रद्द : अतिरिक्त शिक्षकांची संख्या न वाढण्यासाठी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने संच मान्यतेचे निकष बदलल्यामुळे मागील काही वर्षांत अतिरिक्त शिक्षकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांच्या समायोजनांचे प्रश्न शिक्षण विभागापुढे बिकट ठरत आहे. त्यामुळे शालेय शिक्षक व क्रीडा विभागाने यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावर्षी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली की, अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढले होते. विषयानुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरत होते.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्नही बिकट आहे. शासन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना वेतन देत असले तरी त्यांच्याकडे शिकवणीचे काम नाही. ही अवस्था संपूर्ण राज्यातील आहे.गेल्या काही वर्षांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न बिकट असताना, संचमान्यतेनंतर पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढू नये म्हणून यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांना पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्णत: करणे शक्य होत नसल्यामुळे संस्थाचालकांना विद्यार्थी संख्येत वाढ करण्याकरिता संचमान्यता स्थगित करून एक संधी देण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.संचमान्यतेचे निकष बदलल्याचे परिणामअतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न हा शासनाने आॅगस्ट २०१५ मध्ये काढलेल शासन निर्णयामुळे भेडसावत आहे. संचमान्यता ठरविताना शहर, ग्रामीण, डोंगराळ भागातील असंतुलितपणा याकडे लक्ष वेधले नाही. पूर्वी संचमान्यता ठरविताना २० विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक असायचा.अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जुने निकष लागू होत नाही. तोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचा लोंढा सुरू राहणार आहे.समायोजनाचा गोंधळ कायमज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्या शाळेमध्ये निर्माण झालेली पदांची माहिती मिळणार नाही. संचमान्यता स्थगित केल्यामुळे त्या पदांना ब्रेक लागेल. रिक्त पदांची माहिती मिळू न शकल्यामुळे आधीच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे अवघड जाईल. त्यामुळे संचमान्यतेचा गोंधळ कायम राहील, असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे.शासनाला दरवर्षी संचमान्यता करावी लागले. त्यानुसार कोणत्या ठिकाणी किती पदे बसतात. त्यानुसार समायोजन केल्या जाते. यावर्षी ही संचनामान्यता स्थगित केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे. त्यांचे समायोजन यावर्षी होणार नाही.-विलास बोबडे,जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर

टॅग्स :Teacherशिक्षक