शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे.

ठळक मुद्देसंच मान्यता रद्द : अतिरिक्त शिक्षकांची संख्या न वाढण्यासाठी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने संच मान्यतेचे निकष बदलल्यामुळे मागील काही वर्षांत अतिरिक्त शिक्षकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांच्या समायोजनांचे प्रश्न शिक्षण विभागापुढे बिकट ठरत आहे. त्यामुळे शालेय शिक्षक व क्रीडा विभागाने यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावर्षी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.२८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचे निकष बदलण्यात आले आहे. त्यानुसार वर्ग १ ते ५ शाळेत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक, वर्ग ६ ते ८ शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वर्ग ९ ते १० शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे निकष लावण्यात आले आहे. हे निकष ग्रामीण, शहर आणि दुर्गम व डोंगराळ भागातही कायम आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली की, अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण वाढले होते. विषयानुसार काही शिक्षक अतिरिक्त ठरत होते.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचे प्रश्नही बिकट आहे. शासन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना वेतन देत असले तरी त्यांच्याकडे शिकवणीचे काम नाही. ही अवस्था संपूर्ण राज्यातील आहे.गेल्या काही वर्षांत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न बिकट असताना, संचमान्यतेनंतर पुन्हा अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढू नये म्हणून यावर्षी संचमान्यता रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांना पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्णत: करणे शक्य होत नसल्यामुळे संस्थाचालकांना विद्यार्थी संख्येत वाढ करण्याकरिता संचमान्यता स्थगित करून एक संधी देण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.संचमान्यतेचे निकष बदलल्याचे परिणामअतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न हा शासनाने आॅगस्ट २०१५ मध्ये काढलेल शासन निर्णयामुळे भेडसावत आहे. संचमान्यता ठरविताना शहर, ग्रामीण, डोंगराळ भागातील असंतुलितपणा याकडे लक्ष वेधले नाही. पूर्वी संचमान्यता ठरविताना २० विद्यार्थ्यामध्ये एक शिक्षक असायचा.अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जुने निकष लागू होत नाही. तोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचा लोंढा सुरू राहणार आहे.समायोजनाचा गोंधळ कायमज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे. त्या शाळेमध्ये निर्माण झालेली पदांची माहिती मिळणार नाही. संचमान्यता स्थगित केल्यामुळे त्या पदांना ब्रेक लागेल. रिक्त पदांची माहिती मिळू न शकल्यामुळे आधीच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणे अवघड जाईल. त्यामुळे संचमान्यतेचा गोंधळ कायम राहील, असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे.शासनाला दरवर्षी संचमान्यता करावी लागले. त्यानुसार कोणत्या ठिकाणी किती पदे बसतात. त्यानुसार समायोजन केल्या जाते. यावर्षी ही संचनामान्यता स्थगित केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे. त्यांचे समायोजन यावर्षी होणार नाही.-विलास बोबडे,जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर

टॅग्स :Teacherशिक्षक