शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

लॉकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यास मुभा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

सावरगाव : लॉकडाऊन शिथिल करुन लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन ...

सावरगाव : लॉकडाऊन शिथिल करुन लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन मेश्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्याने सर्व छोटी-मोठी दुकाने बंद पडली. रोजगारच नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तरुण, युवक, गरीब, सर्वसामान्य लोक तोंड देत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी वगळता सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. दिवसभर काम करून सकाळ-संध्याकाळचे पोट भरणाऱ्या श्रमिक कामगारांचे उपासमारीमुळे हाल होत आहेत. टपरीवाल्यापासून ते अगदी छोटे व्यवसाय करणारे लोक धंदे बंद पडल्याने मानसिकरीत्या ढासळत चालले आहेत. तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीकडून पाचशे रुपयांवर वीजबिल असले तरी मार्च अखेरच्या नावाखाली वीज खंडित केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र घरबसल्या पगार मिळत आहे. मात्र सर्वसामान्य जनता उपासमारीने मरत आहे. याबाबीचा सरकारने विचार केला पाहिजे. अशा उपासमारीच्या परिस्थितीत जगावे की मरावे? हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे लाॅकडाऊन शिथिल करावे, अशी मांगणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम, महिला अध्यक्ष कल्पना खरात, महासचिव शैलेंद्र बारसागडे, सचिव संतोष जीवतोडे, केशव माटे, धर्मवीर गराडकार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.