शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जिल्हा परिषदेच्या जीर्ण इमारतींचे करणार निर्लेखन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:25 PM

जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत ठराव मंजूर : काँग्रेसच्या सदस्यांनी केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या कार्यालयीन इमारतींची स्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव विविध विभागांच्या प्रमुखांनी शुक्रवारी जि़ प़ च्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याने पुढील कार्यवाही येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, खरीप हंगाम सुरू होवूनही शेतकऱ्यांना बियाणे व सेंद्रीय खत उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी मनमानी कारभाराचा आरोप करून सभागृहातून बहिर्गमन केले़ शिवाय, प्रवेशद्वारा हातात फलक घेवून सत्ताधाऱ्यांविरूद्ध घोषणाबाजी केली.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण व पंचायत विभागाच्या इमारतींचे निर्लेखन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेतला नाही तर नागरिकांची गैरसोय होत असतानाच भविष्यात धोका निर्माण होवू शकतो, अशी भूमिका सत्ताधारी सदस्यांनी मांडली़ त्यामुळे निर्लेखनाच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी प्रदान केली़ रमाकांत लोधे यांनी जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या विद्युत देयकांवरील खर्चाचा प्रश्न उपस्थित केला असता सन २०१७-१८ मध्ये २ कोटी ८५ लाख २५ हजार रुपये विद्युत देयकावर खर्च झाल्याचे नोंदवून पुढील वर्षासाठी २ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे उत्तर सभागृहात देण्यात आले. दरम्यान २१ मार्चच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्षांनी का दिली नाही, असा प्रश्न काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला़ सत्ताधारी पदाधिकाºयांकडून कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. जिल्ह्यातील नऊ हजार ७५० बोअरवेलचे क्लोरीनेशन युनिट बसविण्याबाबत वर्षभरापासून चालढकल केली जात आहे, असा आरोपही करण्यात आला़३७२ गावातील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. तरीही सभागृहात याबाबतचे उत्तर देण्यात आले नाही. चिमूर व नागभीड तालुक्यातील धानाचे पुंजणे जळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याचा प्रश्न भोजराज मरस्कोल्हे यांनी विचारला होता. नागरी सुविधा योजनेअंतर्गत ५० लाखांचा निधी भिसी ग्रामपंचायतला उपलब्ध झाला. मात्र, ई-निविदा व अंदाजपत्रक तयार न करता ग्रामसेवकाने तोंडी सूचना देऊन काम करायला लावले, असा आरोप गजानन बुटके यांनी केला़ या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसून ग्रामसेवक राजेश येवले यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, तसेच ही ई-निविदा रद्द करावी, अशी मागणीही बुटके यांनी केली. परंतु, सत्ताधाºयांकडून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाही व चर्चाही घडवून आणली नाही असा आरोप काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांच्यासह इतर सदस्यांनी केला आहे. भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याचा व हिरापूर येथील ऋषभ किरण धनविजय हा विद्यार्थी २०१२ मध्ये शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.कृषी, आरोग्य प्रश्नांवरून विरोधक आक्रमकआरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या ग्लुकोज तपासणीच्या स्ट्रिप्स उपलब्ध नाहीत. गौतम निमगडे यांनी या समस्येकडे लक्ष वेधले. चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची समस्याही मांडण्यात आली. खरीप हंगाम सुरू होवूनही शेतकऱ्यांना बियाणे न मिळल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी सत्ताधाºयांना धारेवर धरले. त्यामुळे जि. प. च्या सर्वसाधारण सभेत आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले.