शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
2
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
3
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
4
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
5
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
6
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
7
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
8
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
9
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
11
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
12
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
13
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
14
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
16
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
17
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
18
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
19
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
20
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी

चंद्रपूर : प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी मार्गे दररोज २५ ते ३० किमी पायदळ चालून बुधवारी चंद्रपुरात प्रवेश केला. त्यांचे आगमन होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.रतनमुनी महाराजांचा दीपककुमार तुषारकुमार डगली यांच्या निवासस्थानावरुन जैन भवन येथे प्रवेश झाला. यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी जयघोष केला. यावेळी रायपूर, दुर्ग, भिलाई, मुंबई, वरोरा, वणी, देवरा, सिरसा, हिंगोली, गडचिरोली, बिजा येथून मोठ्या संख्येने भाविक आले. जनसमुदायाला गुरु महाराजांनीे प्रवचन केले. यावेळी गुरु महाराजांनी धर्म, तप, आराधना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. मानवता हाच खरा धर्म असून हा प्रत्येक व्यक्तीकडून मानवता धर्माची जोपासना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना रतनमुनीजी यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या काळात मनुष्याला संत आणि सत्संगाचा सहवास लाभत असल्याने आदर्श समाज आणि व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी व्यसनमुक्त राहून धार्मिक व सामाजिक कार्यात वेळ देत असल्याने मनुष्याचे जीवन सर्वांग सुंदर होते, अलिकडे मात्र वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्य स्वभावातही अमुलाग्र बदल होत असून मानवाला मानवता धर्माचा विसर पडू लागल्याची खंत रतनमुनी महाराज यांनी व्यक्त केली. मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असल्याने मनुष्याने जीवनाचा अर्थ समजून इच्छा विरहीत जीवन जगून सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जो माणूस अहंकारी, मन, मत व जाती भेद करून मानवता धर्माला विसरू लागला आहे. त्या माणसाचा पुर्नजन्म होत नसतो, असे सांगताना माणसाने अहंकारी न राहण्याचा सल्ला दिला. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आदर्श व्यक्ती आणि समाजाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करताना रतनमुनी महाराज यांनी संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी निस्पृह, निस्वार्थी आणि निष्कलंक मनुष्याची गरज असून परमार्थासाठी संसाराचा त्याग करणारे संत मंडळी हे कार्य करीत असल्याचे गुरुमहाराजांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान, भोपालसिंगजी खडोड यांच्याकडून भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, राज पुगलिया, रविंद्र बैद, दीपक डगली, पंकज बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, दीपक पारख, पदम लोढा, किशोर गांधी, दिलीप बोहरा, प्रशांत बैद, अमित बैद, संदीप बाढीया, फेनबाबू भंडारी, सुहास साकले, सुधीर बाढीया, अशोक बोथरा, राहूल पुगलिया आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)