शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी

चंद्रपूर : प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी मार्गे दररोज २५ ते ३० किमी पायदळ चालून बुधवारी चंद्रपुरात प्रवेश केला. त्यांचे आगमन होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.रतनमुनी महाराजांचा दीपककुमार तुषारकुमार डगली यांच्या निवासस्थानावरुन जैन भवन येथे प्रवेश झाला. यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी जयघोष केला. यावेळी रायपूर, दुर्ग, भिलाई, मुंबई, वरोरा, वणी, देवरा, सिरसा, हिंगोली, गडचिरोली, बिजा येथून मोठ्या संख्येने भाविक आले. जनसमुदायाला गुरु महाराजांनीे प्रवचन केले. यावेळी गुरु महाराजांनी धर्म, तप, आराधना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. मानवता हाच खरा धर्म असून हा प्रत्येक व्यक्तीकडून मानवता धर्माची जोपासना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना रतनमुनीजी यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या काळात मनुष्याला संत आणि सत्संगाचा सहवास लाभत असल्याने आदर्श समाज आणि व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी व्यसनमुक्त राहून धार्मिक व सामाजिक कार्यात वेळ देत असल्याने मनुष्याचे जीवन सर्वांग सुंदर होते, अलिकडे मात्र वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्य स्वभावातही अमुलाग्र बदल होत असून मानवाला मानवता धर्माचा विसर पडू लागल्याची खंत रतनमुनी महाराज यांनी व्यक्त केली. मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असल्याने मनुष्याने जीवनाचा अर्थ समजून इच्छा विरहीत जीवन जगून सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जो माणूस अहंकारी, मन, मत व जाती भेद करून मानवता धर्माला विसरू लागला आहे. त्या माणसाचा पुर्नजन्म होत नसतो, असे सांगताना माणसाने अहंकारी न राहण्याचा सल्ला दिला. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आदर्श व्यक्ती आणि समाजाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करताना रतनमुनी महाराज यांनी संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी निस्पृह, निस्वार्थी आणि निष्कलंक मनुष्याची गरज असून परमार्थासाठी संसाराचा त्याग करणारे संत मंडळी हे कार्य करीत असल्याचे गुरुमहाराजांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान, भोपालसिंगजी खडोड यांच्याकडून भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, राज पुगलिया, रविंद्र बैद, दीपक डगली, पंकज बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, दीपक पारख, पदम लोढा, किशोर गांधी, दिलीप बोहरा, प्रशांत बैद, अमित बैद, संदीप बाढीया, फेनबाबू भंडारी, सुहास साकले, सुधीर बाढीया, अशोक बोथरा, राहूल पुगलिया आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)