शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

रतनमुनीजी महाराजांचे चंद्रपुरात आगमन

By admin | Updated: July 9, 2014 23:22 IST

प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी

चंद्रपूर : प. पुज्य वाणीभूषण पंडीतरत्न महाश्रमण रतनमुनीजी, डॉ. सतीशमुनीजी, शुक्लमुनीजी, रमनमुनीजी, आदित्यमुनीजी यांचे २०१४ च्या चातुर्मासाकरिता छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून साकोली-ब्रह्मपुरी मार्गे दररोज २५ ते ३० किमी पायदळ चालून बुधवारी चंद्रपुरात प्रवेश केला. त्यांचे आगमन होताच भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.रतनमुनी महाराजांचा दीपककुमार तुषारकुमार डगली यांच्या निवासस्थानावरुन जैन भवन येथे प्रवेश झाला. यावेळी सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी जयघोष केला. यावेळी रायपूर, दुर्ग, भिलाई, मुंबई, वरोरा, वणी, देवरा, सिरसा, हिंगोली, गडचिरोली, बिजा येथून मोठ्या संख्येने भाविक आले. जनसमुदायाला गुरु महाराजांनीे प्रवचन केले. यावेळी गुरु महाराजांनी धर्म, तप, आराधना करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. मानवता हाच खरा धर्म असून हा प्रत्येक व्यक्तीकडून मानवता धर्माची जोपासना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना रतनमुनीजी यांनी व्यक्त केली. यापूर्वीच्या काळात मनुष्याला संत आणि सत्संगाचा सहवास लाभत असल्याने आदर्श समाज आणि व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी व्यसनमुक्त राहून धार्मिक व सामाजिक कार्यात वेळ देत असल्याने मनुष्याचे जीवन सर्वांग सुंदर होते, अलिकडे मात्र वैज्ञानिक प्रगतीमुळे मनुष्य स्वभावातही अमुलाग्र बदल होत असून मानवाला मानवता धर्माचा विसर पडू लागल्याची खंत रतनमुनी महाराज यांनी व्यक्त केली. मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असल्याने मनुष्याने जीवनाचा अर्थ समजून इच्छा विरहीत जीवन जगून सत्कार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जो माणूस अहंकारी, मन, मत व जाती भेद करून मानवता धर्माला विसरू लागला आहे. त्या माणसाचा पुर्नजन्म होत नसतो, असे सांगताना माणसाने अहंकारी न राहण्याचा सल्ला दिला. बलशाली भारताच्या निर्मितीसाठी आदर्श व्यक्ती आणि समाजाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करताना रतनमुनी महाराज यांनी संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी निस्पृह, निस्वार्थी आणि निष्कलंक मनुष्याची गरज असून परमार्थासाठी संसाराचा त्याग करणारे संत मंडळी हे कार्य करीत असल्याचे गुरुमहाराजांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान, भोपालसिंगजी खडोड यांच्याकडून भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, राज पुगलिया, रविंद्र बैद, दीपक डगली, पंकज बोथरा, नरेश तालेरा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, दीपक पारख, पदम लोढा, किशोर गांधी, दिलीप बोहरा, प्रशांत बैद, अमित बैद, संदीप बाढीया, फेनबाबू भंडारी, सुहास साकले, सुधीर बाढीया, अशोक बोथरा, राहूल पुगलिया आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)