शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:34 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. हा पाणी धान पिकांसाठी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर जिल्हा हा कृषी प्रधान आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान, कापूस, सोयाबीनचेे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे वरच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना शेती करावी लागते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. कडक ऊन तापत असल्याने पीक कोमेजायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र मंगळवारी व बुधवारी पावसाने जिल्ह्याभरात चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली आहे. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे.

निंदनासाठी मजूर मिळेना

चंद्रपूर : वेळी-अवेळी पाणी आल्याने धान पिकांत मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निंदन सुरु झाले आहे. मात्र निंदनासाठी मजूर भेटणे कठीण झाले आहे.

शेतात उभारा पक्षी थांबे

चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे आदी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी शेतात विविध ठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.