ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:48 AM2018-12-11T00:48:14+5:302018-12-11T00:49:37+5:30

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते.

Rabby shock of a cloudy atmosphere | ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

ढगाळ वातावरणाचा रब्बीला फटका

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : सरासरी ९५ हजार हेक्टर क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही भागात अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. पाऊसही कमी झाला. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रबीवरच शेतकऱ्यांची भिस्त होती. सुरुवातीला चांगले वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू आणि हरभराचे पीक घेतले जाते.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभरच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन रबी पिकांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय ढगाळ वातावरणात पिकांवर कीडीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभराचे पीक आहे. ते ३२ हजार ५८३ हेक्टर इतके आहे. गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ इतके आहे. ज्वारीचे क्षेत्र सहा हजार ५७३ हेक्टर इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरणीची टक्केवारी कमी होती.
अनेक ठिकाणी धान कापणी सुरु होती. कापसाची वेचणीचाही हंगाम सुरु असल्याने रब्बी पिकांची पेरणीची कामे मागे पडली होती. आता धान कापणी पूर्ण झाली आहे. कापूस वेचणीचे कामही आटोपले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रब्बीच्या पेरणीची कामे पूर्ण केली. मात्र आता बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकºयांना बसत आहे.
 

Web Title: Rabby shock of a cloudy atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.