शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

२१ मोलकरणींच्या रोटीची सोय; सात हजार जणींचे पोट कसे भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

चंद्रपूर जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी सन २०२० मध्ये ...

चंद्रपूर जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी सन २०२० मध्ये केवळ सात हजार ३५७ घरकाम करणाऱ्यांची नोंदणी केली आहे. दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे गरजेचे असते; मात्र याकडे घरकाम करणाऱ्या महिलांचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ २१ महिलांनी नोंदणीचे नूतनीकरण केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी सुरू केली आहे. घराबाहेर निघण्यास निर्बंध घातले आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे काम बंद झाल्याने त्यांना अडचण निर्माण झाली आहे. अशांना मदत करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने नोंदणीकृत महिलांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत सात हजार ३५७ महिलांपैकी केवळ २१ महिलांनी यंदा नूतनीकरण केल्याने त्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या महिलांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटला; परंतु उर्वरित महिलांचे काय, असा प्रश्न कामगार संघटनांकडून होत आहे.

बॉक्स

अनेक मोलकरणींची नोंदच नाही

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे घर कामगार महिलांची नोंद केली जाते. त्यांच्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात; परंतु या अनुषंगाने प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक महिला घरकाम करूनही त्याची नोंद सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे करीत नाहीत. नोंदणीच्या या घोळामुळेच या घरकामगार महिला मदतीपासून वंचित राहत आहेत.

बॉक्स

नूतनीकरण केलेल्या घरकामगारांनाच मदत

चंद्रपूर येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे सात हजार ३५७ घर कामगार महिलांची नोंद आहे. या घरकामगार महिलांनी दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे; मात्र यंदा केवळ २१ जणांनीच नूतनीकरण केले आहे. त्यामुळे त्यांनाच ही मदत मिळणार आहे. परिणामी, अनेक महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत.

कोट

जिल्ह्यात सात हजार ३५७ कामगार महिलांची नोंद आहे; परंतु त्यापैकी केवळ २१ जणांनीच नूतनीकरण केले आहे. त्यामुळे त्यांनाच मदत मिळणार आहे. घरकाम करणाऱ्या महिलांनी, तसेच कामगारांनी संचारबंदी हटल्यानंतर कामगार कार्यालयात येऊन ऑनलाइन नूतनीकरण करावे.

-नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर

------

कोट

शासनाने संचारबंदीच्या काळात मदत देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे; परंतु ही मदत कुठल्याही अटी व शर्ती न लावता, त्वरित द्यावी, हाताला काम नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. -द्वारकाबाई गेडाम.

-----

बऱ्याच वर्षांपासून धुणी-भांडी घासण्याचे काम करीत आहे. त्याचीपण नोंदणी करायची असते. याबाबत कुठलीही माहिती नाही. त्यामुळे आता शासनाने सरसकट मदत करावी. लॉकडाऊन संपल्यानंतर नोंदणी करू.

-पर्वता राऊत.