शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 16:52 IST

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन

चिमूर (चंद्रपूर) : शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे आम आदमी पार्टीतर्फे शुक्रवारी दुपारी ‘शिक्षण सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन करण्यात आले. त्यात तहसील कार्यालयात चक्क बकऱ्या चारून सरकारचा निषेध करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये आधीच शिक्षणाची उदासीनता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत सुधार करून मुला-मुलीना शिक्षणासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारच्या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागातील नवीन पिढीचे शिक्षण खुंटविण्यात व त्यांना जंगलात बकऱ्या चरण्यासाठी व बालमजुरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची चुकीची नीती जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालविणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले आहे. त्यावर उपाय म्हणून आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनरुज्जिवित करण्यासाठी का वापरण्यात येऊ नये, असाही सल्ला देत सरकार खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टींवर जीएसटी वसूल करते, जनतेच्या या पैशांचा वापर आमदार-मंत्र्यांच्या चैनीसाठी न करता शिक्षणावर का करू नये,असे अनेक प्रश्न सरकारला यावेळी विचारण्यात आले. चिमूर विधानसभेतील ६० शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून गावोगावी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपतर्फे देण्यात आला. 

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाAAPआपchimur-acचिमूरState Governmentराज्य सरकार