शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 16:52 IST

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन

चिमूर (चंद्रपूर) : शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे आम आदमी पार्टीतर्फे शुक्रवारी दुपारी ‘शिक्षण सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन करण्यात आले. त्यात तहसील कार्यालयात चक्क बकऱ्या चारून सरकारचा निषेध करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये आधीच शिक्षणाची उदासीनता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत सुधार करून मुला-मुलीना शिक्षणासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारच्या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागातील नवीन पिढीचे शिक्षण खुंटविण्यात व त्यांना जंगलात बकऱ्या चरण्यासाठी व बालमजुरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची चुकीची नीती जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालविणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले आहे. त्यावर उपाय म्हणून आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनरुज्जिवित करण्यासाठी का वापरण्यात येऊ नये, असाही सल्ला देत सरकार खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टींवर जीएसटी वसूल करते, जनतेच्या या पैशांचा वापर आमदार-मंत्र्यांच्या चैनीसाठी न करता शिक्षणावर का करू नये,असे अनेक प्रश्न सरकारला यावेळी विचारण्यात आले. चिमूर विधानसभेतील ६० शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून गावोगावी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपतर्फे देण्यात आला. 

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाAAPआपchimur-acचिमूरState Governmentराज्य सरकार