शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 16:52 IST

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन

चिमूर (चंद्रपूर) : शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे आम आदमी पार्टीतर्फे शुक्रवारी दुपारी ‘शिक्षण सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन करण्यात आले. त्यात तहसील कार्यालयात चक्क बकऱ्या चारून सरकारचा निषेध करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये आधीच शिक्षणाची उदासीनता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत सुधार करून मुला-मुलीना शिक्षणासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारच्या निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याची वेळ येत आहे. ग्रामीण भागातील नवीन पिढीचे शिक्षण खुंटविण्यात व त्यांना जंगलात बकऱ्या चरण्यासाठी व बालमजुरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारची चुकीची नीती जबाबदार आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा चालविणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले आहे. त्यावर उपाय म्हणून आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनरुज्जिवित करण्यासाठी का वापरण्यात येऊ नये, असाही सल्ला देत सरकार खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टींवर जीएसटी वसूल करते, जनतेच्या या पैशांचा वापर आमदार-मंत्र्यांच्या चैनीसाठी न करता शिक्षणावर का करू नये,असे अनेक प्रश्न सरकारला यावेळी विचारण्यात आले. चिमूर विधानसभेतील ६० शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून गावोगावी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपतर्फे देण्यात आला. 

टॅग्स :agitationआंदोलनSchoolशाळाAAPआपchimur-acचिमूरState Governmentराज्य सरकार