शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तप्त उन्हात प्रकल्पग्रस्त शेतकरी उतरले रस्त्यावर; चार तास रोखून धरली वेकोलीची कोळसा वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 11:25 IST

तीव्र आंदोलनाचा इशारा

गोवरी (चंद्रपूर) : वेकोली कोळसा खाणीत शेती अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता राजुरा तालुक्यातील साखरी, वरोडा, निमनी, पोवनी, गोवरी, चिंचोली येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात भर दुपारच्या उन्हात तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, वेकोली अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी वेळोवेळी अन्याय व अपमान झाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांच्या आक्रोशाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. यावेळी ॲड. चटप यांनी सर्व नागरिकांना शांत करीत अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. अखेर पंधरा दिवसांत सर्व समस्या सोडविणार असल्याचे वेकोली अधिकाऱ्यांनी सांगितले. जर पुन्हा यात हयगय झाली तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनामुळे चार तास वेकोलीची कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. वेकोलीच्या क्षेत्रीय नियोजन अधिकारी जी. पुलय्या व उपकार्मिक व्यवस्थापक शैलेश माटे यांनी आंदोलकांपुढे उपस्थित होऊन येत्या पंधरा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या दोन्ही अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकरी व महिला यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आंदोलनात रवी गोखरे, मदन सातपुते, कपिल ईद्दे, कवडू पोटे, मधुकर चिंचोलकर, दत्तू ढोके, संजय करमनकर, दिलीप देठे, हरिश्चंद्र आवारी, साखरी सरपंच प्रणाली मडावी, पोवनी सरपंच पांडुरंग पोटे, चार्ली सरपंच सुरेंद्र आवारी, गोयेगाव सरपंच बंडू कोडापे, निमणी सरपंच अतुल धोटे, बाखर्डी सरपंच अरुण रागीट, उपसरपंच संतोष डोंगे, विजय मिलमिले, गणेश रोगे,गणपत अडवे, पंढरी घटे, विठ्ठल पाल, सचिन कुडे, गणेश रोगे, मारोती लांडे आदी सहभागी झाले होते. राजुराचे ठाणेदार योगिराज पारधी, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अशा आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या

पोवनी २ व पोवनी ३ या कोळसा खाणीकरिता भूसंपादन केलेल्या व शिल्लक राहिलेल्या सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला द्यावा आणि या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळ नोकरीचे आदेश द्यावे. परिसरातील काही गावांतील शिल्लक राहिलेली जमीन भूसंपादित करण्यात यावी, कोळसा खाण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकरीत अग्रक्रमाने समाविष्ट करावे.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर