खरीप पिकांचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:32+5:30
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे.

खरीप पिकांचे उत्पादन घटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : धान उत्पादनात पुढे असलेल्या जिल्ह्याला काही दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीपातील अन्य पिकांना जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम जातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे, तर काही ठिकाणी उशिरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे. कित्येक शेतकरी धानासह तूर पिकावर महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. तीन वर्षांचा दुष्काळ झेलत हिम्मतीने शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना यावर्षीही पावसाचा फटका बसला आहे. जून महिन्यात पावसाच्या अत्यल्प हजेरीने शेतकºयांची पेरणी, रोवणी अर्धी लांबली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पावसाला सुरूवात झाली खरी. परंतु पावसाने काही ठिकाणीच हजेरी लावली. सुरूवातीच्या कालखंडात योग्यवेळी पाऊस न झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी पूर्ण करता आली नाही. आॅगस्ट महिन्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे निंदनासह शेती कामांना खºया अर्थाने पुन्हा वेग आला होता. त्यानंतर मात्र संततधार पावसामुळे धान कमी पण तण जास्त, अशी स्थिती झाल्याने यावर्षी शेतकºयांच्या खर्चात वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिना अखेरपर्यंत समाधानकारक पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, सोयाबीन कापणीच्या वेळीही पावसाची रिपरिप लवकर बंद न झाल्याने काही तालुक्यातील धान पीक जागेवर सडले. आजही शेतशिवारात त्याची दुर्गंधी पसरत आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला आहे. धानाला तुडतुडा, अळी, करपा, कडाकरपासारख्या रोगांनी तर तूर पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
निसवणाच्या अवस्थेतील धानाच्या लोंबी पूर्णत: पांढरी होत असून त्याचा परिणाम दाने भरण्यावर झाला आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात दाणे पोचटच असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाचे काही अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी नुकसान टाळता येऊ शकते. मात्र, त्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून गावागावांत मार्गदर्शन शिबिर सुरू करणे गरजेचे आहे.
हमीभाव कागदावरच
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर प्रारंभी पावसाने हजेरी लावली. परंतु काही दिवसांत दीर्घ उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकºयांच्या पेरणीचे नियोजन चुकले. नंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सप्टेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे कपाशीची गळती तर दुसरीकडे परतीच्या पावसाने कापणी केलेले सोयाबीन ओले, असे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी मृगाच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र, नंतर दडी मारली. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने शेतकºयांचे स्वप्न भंगले. सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर तालुक्यात हलके धान निघाले. १८ ते २० पण समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी हैराण झाला. शेतकºयांच्या शेतमालात कमी प्रमाणात ओलसर असला तरी प्रमाण अधिक असल्याचे सांगून भाव कमी देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दररोज १५०० पोती माल खरेदी केला जात आहे. १४ आॅक्टोबरपासून सोयाबीन खरेदीला सुरूवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीने ३ हजार पोती सोयाबीन खरेदी केली आहे. मात्र, हमीभाव कागदावरच असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.