शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरुच; भाड्यात दुप्पट-तिप्पट दराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 5:54 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद भाडे १७००, प्रवाशांची लूट पर्यायच नसल्याने प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर

चंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रवासाची साधने कमी असल्याने ट्रॅव्हल्सधारक मनमानी भाडे वसूल करीत आहेत. चंद्रपूर ते औरंगाबादचे भाडे तर १७०० रुपये आकारत आहेत. मात्र पर्याय नसल्याने अतिरिक्त भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ट्रॅव्हल्स तर खचाखच भरून धावत आहेत. तसेच त्यांनी भाडेवाढसुद्धा केली आहे.

चंद्रपुरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, राजुरा आदी मार्गावर ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यातच कोरोनाने रेल्वेही अल्प प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. परिणामी ट्रॅव्हल्सची प्रत्येक फेरी खचाखच भरून धावते. तपासणीही होत नसल्याने वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी

प्रवाशांची हेडसांड होऊ नये वाहतूक विभागातर्फे व आरटीओतर्फे स्कूल बसेस, खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. तपासणीसाठी पोलिसांचे पथकही गठित केले आहे. तसेच निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक सीट भरल्या, तर आरटीओचे किंवा वाहतूक विभागाचे पथक कारवाई करीत होते. मात्र संप सुरू असल्याने पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे की काय, असे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. ते अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?

ट्रेनही बंद आहे. बससुद्धा नाही. परंतु, कामानिमित्त प्रवास करावाच लागतो. त्यामुळे इच्छा नसूनही, पर्याय नाही म्हणून अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

- अमित दुधे, प्रवासी

चंद्रपूर ते गडचिरोली जाण्यासाठी बसने केवळ ९० रुपये लागायचे. परंतु, ट्रॅव्हल्सने १०० रुपये द्यावे लागतात. तेसुद्धा ट्रॅव्हल्स व्याहाडपर्यंत जात असते. पर्याय नसल्याने प्रवास करावाच लागतो.

- धम्मदीप बोरकर, प्रवासी

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलनpassengerप्रवासीPublic Transportसार्वजनिक वाहतूकticketतिकिट