शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

कापूस दरवाढीने खासगी व्यापारी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:25 PM

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देकापूस विक्रीनंतर वाढले दर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने कवडीमोल भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शासनाने कापूस पिकांसाठी पाच हजार चारशे पन्नास रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु सरकारी केंद्रावरील जाचक अटीने शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नेला नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी मिळेल त्या कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला.दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असतानाच खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने कवडीमोल दरात कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली. कापसाचे दर वाढण्याचे कोणतेच संकेत नसल्याने शेतकºयांनी बँकाचे कर्ज भरण्यासाठी कापूस विकून टाकला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.कापसाचे दर आता ४०० ते ५०० रूपयांनी वाढल्याने त्याचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस होता, त्यावेळेस भाव वाढले नाही. आता कापूस संपल्यावर कापसाचे दर वाढले आहे. त्यामुळे कापूस दरवाढीचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाºयांना झाला आहे. यात मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.कापूस दरवाढ कुणासाठी?शेतकरी आपल्या गरजेपोटी कवडीमोल दरात कापूस विकत असतो. यावर्षी कापसाची दरवाढ होईल, या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला होता. परंतु मार्च एन्डींगमध्ये कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. आता कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.