शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी गौरवोल्लेख करण्यासारखी कामे करा

By admin | Updated: February 25, 2017 00:34 IST

विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, ..

सुधीर मुनगंटीवार : विजयी भाजपा उमेदवारांचा अभिनंदन सोहळा चंद्रपूर : विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रानुसार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या क्षेत्रात कार्यरत आहे. सत्तेला आम्ही नेहमीच जनतेच्या सेवेचे साधन मानले आहे. या जिल्ह्यातील जनतेने विकासाच्या गाडीची गती वाढविण्यासाठी मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखविली आहे. या विजयाच्या मुळाशी कार्यकर्त्यांची शक्ती आहे. आम्हाला या जिल्ह्यास प्रगतीच्या शिखरावर न्यायचे आहे. त्यातून एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात जिल्हा असावा, तर चंद्रपूर जिल्ह्यासारखा असा गौरवोल्लेख करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.दिनांक 24 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांच्या अभिनंदन सोहळ्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी मंत्री संजय देवतळे, जैनुद्दीन जव्हेरी, विजय राऊत, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जो निवडून येतो त्याच्यासमोर जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आव्हान असते. आपण हे आव्हान हे निश्चितपणे पूर्ण कराल, असा मला विश्वास आहे. जिल्हा परिषदेचा संबंध ग्रामीण भागाच्या विकासाशी प्रामुख्याने निवारा, शिक्षण, रस्ते, पाणी, कृषी क्षेत्र आदींशी येते. जि.प. च्या कायद्यांचा अभ्यास करत प्रत्येक विजयी उमेदवाराने आपले जनसंपर्क कार्यालय उघडून त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, आपल्या मतदार संघाच्या विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून, जनतेच्या आशिवार्दातून साकारला असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. जनतेच्या विकासासंबंधी आशा-आकांक्षांची पूर्तता करीत त्या माध्यमातून भाजपाचे संघटनकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. नाना शामकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींची समयोचित भाषणे झालीत. सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा नेते प्रमोद कडू यांनी केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)