शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्याने हतबल मुलांचे

By admin | Updated: November 14, 2016 00:49 IST

गरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या...

आयुष्य उमलण्यापूर्वीच कोमेजले !हाती भिक्षेचा कटोरा : चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरणार कोण?प्रकाश काळे गोवरीगरिबीने हतबल झालेल्या व समाजाने नाकारलेल्या असंख्य चिमुकल्या निरपराध बालकांना खेळण्या-बागळण्याच्या वयात रस्त्यावर, रेल्वे फलाटावर, बसस्थानकावर हाती भिकेचा कटोरा घेऊन त्यांच्यावर भीक मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक निरागस बालकांचे बालपण फुलविण्याच्या वयात त्यांच्या आयुष्याचे मातेरे झाले आहे.शाळा गळती झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयाचा खर्च करते. समाजातील कोणताही बालक अन् बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असा त्या माग उद्देश्य आहे. मात्र गरिबीचा प्रचंड विळखा पडलेल्या निरागस बालकांसाठी शिक्षण तर दूरच. परंतु दोन वेळेचा सांजेची भाकर मिळविण्यासाठी धडपड करावी लागते. बालकदिनी गरिबांच्या मुलांसोबत सेल्फी काढणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात मायेचा पदर धरून कामावर जाणाऱ्या निरागस बालकाच्या आईला बोलते केले असता, ती माऊली म्हणाली की, आम्हाला दोन वेळेच्या सांजेची भाकर मिळत नाही. मजुरी मिळाली तर बरं, नाहीतर उपाशीच झोपून रात्र काढावी लागते. तेव्हा तुकडाभर भाकरसुद्धा कोणी देत नाही. आभाळाखाली अख्य आयुष्यच घालविताना घरादारांचा कोणताही आधार नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडीत वणवण भटकंती करताना जागा मिळेल तिथे राहायच. मिळेल तर चार पैसे जमवायचे. सांजेला पोटाची सोय करायची आणि आयुष्य जगायचं. मग पोराच्या शिक्षणाचे काय, असं विचारताच ती म्हणाली की, आमाले शिक्सन-बिक्सन काई नको. इथं पोटाची भाकर मियत नाही, तिथं शिक्सनाचे काय, असा सवाल करीत तिने डोळ्याला पाणी आणले.जेथे दोन वेळेच्या पोटाचे वांदे आहेत, तिथे आईसोबत मजुरीसाठी पदर धरून जाणाऱ्या निरागस चिमुकल्यांचे बालपण परिस्थितीने गांजले आहे. मायेसोबत काम करायला गेले नाही तर उपाशीच झोपावे लागणार. मग पोट महत्त्वाचे की शिक्षण, हा एकच प्रश्न मनाला विचार करायला लावणारा आहे. एकीकडे एबीसीडी म्हणून नियमित इंग्रजी शाळेत जाणारी मुले तर दुसरीकडे परिस्थितीमुळे शिक्षणाचा जराही गंध नसलेली निरागस बालके हॉटेल, पानटपरीवर काम करताना दिसतात. खाचखडग्यातून वाट काढताना आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत संघर्षमय जीवन जगणे त्यांच्या नशिबी कायमच असते. त्यांचे कोवळे बालपन कामावर हरवून जाते. फक्त त्यांना माहिती आहे दोन वेळेच्या पोटाचा सवाल.आज बालकदिनभारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस बालकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र शिकण्याच्या कोवळ्या वयात या बालकांच्या हाती दुर्दैवाने पाटीपुस्तकांऐवजी भिकेचा कटोरा आला आहे. त्यामुळे आयुष्य घडविण्याच्या वयात त्यांचे आयुष्यच करपून गेले आहे. त्यांच्यासाठी बालकदिनाचे महत्त्व नाही.