शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पोलिसांनो, सोशल मीडियावर आता सांभाळूनच व्यक्त व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:32 IST

सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, मोठे अधिकारीही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत; परंतु आता पोलिसांनासोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यांच्या चक्क आचारसंहिताच लागू केली आहे. याबाबतचे आदेश महासंचालकांनी नुकतेच काढले आहेत. सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे.

दर महिन्याला होणार प्रोफाइलची तपासणी- विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घालून दिलेल्या आचारसंहितांचे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्यासाठी दर महिन्याला प्रोफाईलची तपासणी करण्यात येणार आहे. - त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच अंमलदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पोलिसांसाठीही आचारसंहिता - महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांची प्रतिमा कोणत्याही प्रकारे कुठेही मलीन होईल. असे कृत्य, वर्तन होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. पोलीस खाते शिस्तप्रिय असून, कायद्याची अंमलबजावणी करत गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक असावा.

पोलीस अधीक्षक, आयुक्त ठेवणार वॉच

पोलीस अधिकारी व कर्मचारी काही वादग्रस्त पोस्ट करतात का, सोशल मीडियावर विशिष्ट राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली आपली काही मते व्यक्त करतात का, यावर पोलीस अधीक्षक, आयुक्त वाॅच ठेवणार आहेत. त्यामुळे आता सांभाळून सोशल मीडियाचा वापर करावा लागणार आहे.

शिस्तीत राहणे बंधनकारकपोलीस खाते शिस्तप्रिय आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर तसेच खाकी वर्दीत  असताना त्यांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी नुकतीच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नुकतीच आचारसंहिता जाहीर केली आहे.- अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया