शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अल्पवयीन वाहनचालकांना पोलिसांचे अभय

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या

आयुधनिर्माणी (भद्रावती) : अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारा वाहतूक पोलीस विभाग या चालकांना अभय देत आहे. आता त्यांच्या पालकांवरच कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.दैनंदिन गरजांच्या पूर्ततेकरिता नागरिकांना नेहमीच रस्त्यावरुन चालावे लागते. यात वयोवृद्ध नागरिक, बालके व महिला यांनाही अनेकदा कामानिमित्त शहरात वा बाजारपेठेत यावे लागते. रस्त्यावरुन चालतांना पाठीमागून येणारे वा समोरून जाणारे बेधुंद अल्पवयीन वाहन चालक वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे पादचाऱ्यांची त्रैधातिरपट होते. जवळून पळणाऱ्या वाहनांचा वेगच इतका असतो की, नागरिकांच्या काळजात धस्स होते. अल्पवयीन वाहनचालकांना वाहने पळवितांना दुसऱ्यांच्या जीवाचे काही देणे-घेणे नसल्याने जिल्ह्यात छोट्या-मोठ्या दुर्घटना नित्याच्याच झाल्या आहे. अनेकदा ही बालके मागे पाहतात व वाहन पुढे पळवतात. ते आपल्या अंगावर तर येऊन आपल्याला जखमी करणार नाही ना अशी भीती घराबाहेर पडणाऱ्यांवर विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना असते. अनेकवेळा दुचाकीवर तीन-चार जण बसून वाहने चालवतात. त्यात मुलींचे घोळके पाहून दोन्ही हात सोडणे, तोंडातून विशिष्ठ आवाज काढत आपल्याकडे लक्ष वेधणे, आपल्या वाहनांचा कर्णकर्कश आवाज वाढविणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. रस्त्यावरुन वळण घेताना मागच्याला सिग्नल न देता लगेच टर्न घेणे अशा कितीतरी हरकती बघायला मिळतात. या अल्पवयीन वाहकांना वाहतूक नियमांचे ज्ञान नसल्याने केवळ जोषपूर्ण गाडी पळवीत वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत आहे. सुव्यवस्था हाताळणारा पोलीस विभाग डोळे झाक करून यांना अपत्यक्ष प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अल्पवयीन वाहनधारकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर कार्यवाही करून नागरिकांना रस्त्यावरुन सुखरूप चालण्याचे अभय पोलीस विभाग का देत नाही, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.अल्पवयीन वाहन चालकांना दुचाकी चालवण्यास अप्रत्यक्षपणे पोलीस विभाग डोळेझाक करून जशी मदत करतो त्याच प्रकारे त्यांचे पालकही जबाबदार आहेत. त्यांनीच जर या मुला-मुलींच्या हातात गाडीच्या चाब्या दिल्या नाही तर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना टळू शकते. परंतु प्रेमापोटी पालक आपल्या पाल्याला नियम तोडण्यास लावत आहे.काहीवेळा पालक घरी नसताना बालके त्यांना माहिती होऊ न देता गाडी बाहेर काढतात. हौसेपोटी ती वेगाने पळवून कधी आपले तर कधी दुसऱ्याचे नुकसान करून बसतात. कारणे काहीही असली तरी वाहनांमुळे जे नुकसान होते त्याची भरपाई भरून निघणे शक्य नसते. घडणारे अपघात किरकोळ असल्याने केवळ बाचाबाचीवर प्रसंग निभावले जातात. परंतु कामानिमित्त बाहेर जाणारी घरची व्यक्ती सुखरूप परत येणार की, नाही ही चिंता मात्र कुटूंबियांना सतावते. वाहन चालक अल्पवयाच्या मुला-मुलींच्या पालकांना दोषी घरून कार्यवाही झाल्यास ही समस्याच मुळासकट मिटेल अशी जाणकारांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात ही समस्या प्रत्येक गावात आहे. यावर वेळीच प्रतिबंधक घालणे गरजेचे आहे.डोकेदुखी ठरणार ही समस्या चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, आदी ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळते. पोलीस प्रशासनाने या वाहनधारकांना अडविल्यास काही प्रमाणात का होईना यावर आळा घालता येऊ शकतो. पोलिसांनी मोहीम सुरु करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)