शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन वाहनचालकांना पोलिसांचे अभय

By admin | Updated: November 16, 2014 22:47 IST

अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या

आयुधनिर्माणी (भद्रावती) : अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारा वाहतूक पोलीस विभाग या चालकांना अभय देत आहे. आता त्यांच्या पालकांवरच कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.दैनंदिन गरजांच्या पूर्ततेकरिता नागरिकांना नेहमीच रस्त्यावरुन चालावे लागते. यात वयोवृद्ध नागरिक, बालके व महिला यांनाही अनेकदा कामानिमित्त शहरात वा बाजारपेठेत यावे लागते. रस्त्यावरुन चालतांना पाठीमागून येणारे वा समोरून जाणारे बेधुंद अल्पवयीन वाहन चालक वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे पादचाऱ्यांची त्रैधातिरपट होते. जवळून पळणाऱ्या वाहनांचा वेगच इतका असतो की, नागरिकांच्या काळजात धस्स होते. अल्पवयीन वाहनचालकांना वाहने पळवितांना दुसऱ्यांच्या जीवाचे काही देणे-घेणे नसल्याने जिल्ह्यात छोट्या-मोठ्या दुर्घटना नित्याच्याच झाल्या आहे. अनेकदा ही बालके मागे पाहतात व वाहन पुढे पळवतात. ते आपल्या अंगावर तर येऊन आपल्याला जखमी करणार नाही ना अशी भीती घराबाहेर पडणाऱ्यांवर विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना असते. अनेकवेळा दुचाकीवर तीन-चार जण बसून वाहने चालवतात. त्यात मुलींचे घोळके पाहून दोन्ही हात सोडणे, तोंडातून विशिष्ठ आवाज काढत आपल्याकडे लक्ष वेधणे, आपल्या वाहनांचा कर्णकर्कश आवाज वाढविणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. रस्त्यावरुन वळण घेताना मागच्याला सिग्नल न देता लगेच टर्न घेणे अशा कितीतरी हरकती बघायला मिळतात. या अल्पवयीन वाहकांना वाहतूक नियमांचे ज्ञान नसल्याने केवळ जोषपूर्ण गाडी पळवीत वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत आहे. सुव्यवस्था हाताळणारा पोलीस विभाग डोळे झाक करून यांना अपत्यक्ष प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अल्पवयीन वाहनधारकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर कार्यवाही करून नागरिकांना रस्त्यावरुन सुखरूप चालण्याचे अभय पोलीस विभाग का देत नाही, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.अल्पवयीन वाहन चालकांना दुचाकी चालवण्यास अप्रत्यक्षपणे पोलीस विभाग डोळेझाक करून जशी मदत करतो त्याच प्रकारे त्यांचे पालकही जबाबदार आहेत. त्यांनीच जर या मुला-मुलींच्या हातात गाडीच्या चाब्या दिल्या नाही तर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना टळू शकते. परंतु प्रेमापोटी पालक आपल्या पाल्याला नियम तोडण्यास लावत आहे.काहीवेळा पालक घरी नसताना बालके त्यांना माहिती होऊ न देता गाडी बाहेर काढतात. हौसेपोटी ती वेगाने पळवून कधी आपले तर कधी दुसऱ्याचे नुकसान करून बसतात. कारणे काहीही असली तरी वाहनांमुळे जे नुकसान होते त्याची भरपाई भरून निघणे शक्य नसते. घडणारे अपघात किरकोळ असल्याने केवळ बाचाबाचीवर प्रसंग निभावले जातात. परंतु कामानिमित्त बाहेर जाणारी घरची व्यक्ती सुखरूप परत येणार की, नाही ही चिंता मात्र कुटूंबियांना सतावते. वाहन चालक अल्पवयाच्या मुला-मुलींच्या पालकांना दोषी घरून कार्यवाही झाल्यास ही समस्याच मुळासकट मिटेल अशी जाणकारांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात ही समस्या प्रत्येक गावात आहे. यावर वेळीच प्रतिबंधक घालणे गरजेचे आहे.डोकेदुखी ठरणार ही समस्या चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, आदी ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळते. पोलीस प्रशासनाने या वाहनधारकांना अडविल्यास काही प्रमाणात का होईना यावर आळा घालता येऊ शकतो. पोलिसांनी मोहीम सुरु करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)