शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आनंदवनात ‘अकिरा मियावाकी पॅटर्न’ने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:50 IST

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.

ठळक मुद्देनैसर्गिक पद्धतीने तयार होणार जंगल : श्रमसंस्कार छावणीत देशभरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी

यशवंत घुमे।लोकमत न्यूज नेटवर्कआनंदवन (ता.वरोरा) : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.वाढत्या तापमानापासून सजीव सृष्टीचा ढासळलेला समतोल सांभाळण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे ओळखून आनंदवनच्या वतीने दरवर्षी मूल तालुक्यातील सोमनाथ येथे दरवर्षी श्रमसंस्कार छावणी आयोजित केल्या जाते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा हे शिबिरात आनंदवनात सुरू आहे. या शिबिरादरम्यान विविध प्रजातींची झाडे मियावाकी पद्धतीने लावली जातात.यावर्षी आंबा, बेहडा हिरडा, हल्दू, पेटू, कवठ, शिसम, धामन, बिकामाई, कुसूम, रोहण, आवळा, रक्तचंदन, काळा-पांढरा शिरीष, खडसिंगी आदी मोठे, मध्यम झुडपी आणि लहान आकाराच्या ७४ प्रकारच्या झाडांची दोन एकर परिसरात लागवड करण्यात आली. लागवडीदरम्यान वेगवेगळ्या उंचीच्या वनस्पतींचा नैसर्गिक पद्धतीने मिलाफ करण्यात आला.एकमेकांच्या सहाय्याने व इतर वनस्पतींच्या वाढीला अडथळा न आणता सर्व झाडे नैसर्गिक जंगलाप्रमाणे वाढणार आहेत. त्यासाठी १०० बाय ४० स्केअरफुटाचे पट्टे तयार करून ही वृक्ष लागवड मोहीम पूर्ण झाली.या नाविण्यपूर्ण मोहिमेसाठी डॉ. विकास आमटे, डॉ. भरती आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शीतल आमटे, गौतम करजगी, सुधाकर कडू, रवी नलगंटीवार व देशभरातील विविध राज्यांचे युवा कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.अशी आहे वृक्ष लागवडीची पद्धतजपान देशातील डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली वृक्ष लागवड पद्धत मियावाकी जंगल म्हणून ओळखल्या जाते. कमी जागा व कालावधीत घनदाट जंगल तयार होते. वृक्ष लावण्यासाठी निवडलेल्या जमिनीवर गहू, तणीस व मका कणसाच्या सालीचा भूगा करून आच्छादन घातल्या जाते. जीवामृताचा वापर केला जातो. जमीन नांगरून भुसभुशीत केली जाते. त्याचा फायदा झाडाच्या तंतूमुळांना होतो. चार प्रकारच्या वृक्ष प्रजाती निवडण्यात आल्या. त्यामुळे कोणतीही वनस्पती शेजारच्या वनस्पतीच्या वाढीला अडथळा ठरत नाही. ही झाडे एकमेकांपासून ६० सेंटीमीटर अंतरावर लावली जातात.विदर्भातील सर्वाधिक तापमान लक्षात घेता मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करणे उपयुक्त ठरणार आहे. यात जैवविविधता जपल्या जाते. ही १०० टक्के सेंद्रीय पद्धत आहे. याद्वारे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. श्रमसंस्कार छावणीत ६ हजार झाडे लावण्यात आली. पुढील आठवड्यात ७ हजार झाडे लावणार आहोत.-डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक आनंदवन, वरोरा