शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

आनंदवनात ‘अकिरा मियावाकी पॅटर्न’ने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:50 IST

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.

ठळक मुद्देनैसर्गिक पद्धतीने तयार होणार जंगल : श्रमसंस्कार छावणीत देशभरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी

यशवंत घुमे।लोकमत न्यूज नेटवर्कआनंदवन (ता.वरोरा) : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.वाढत्या तापमानापासून सजीव सृष्टीचा ढासळलेला समतोल सांभाळण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे ओळखून आनंदवनच्या वतीने दरवर्षी मूल तालुक्यातील सोमनाथ येथे दरवर्षी श्रमसंस्कार छावणी आयोजित केल्या जाते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा हे शिबिरात आनंदवनात सुरू आहे. या शिबिरादरम्यान विविध प्रजातींची झाडे मियावाकी पद्धतीने लावली जातात.यावर्षी आंबा, बेहडा हिरडा, हल्दू, पेटू, कवठ, शिसम, धामन, बिकामाई, कुसूम, रोहण, आवळा, रक्तचंदन, काळा-पांढरा शिरीष, खडसिंगी आदी मोठे, मध्यम झुडपी आणि लहान आकाराच्या ७४ प्रकारच्या झाडांची दोन एकर परिसरात लागवड करण्यात आली. लागवडीदरम्यान वेगवेगळ्या उंचीच्या वनस्पतींचा नैसर्गिक पद्धतीने मिलाफ करण्यात आला.एकमेकांच्या सहाय्याने व इतर वनस्पतींच्या वाढीला अडथळा न आणता सर्व झाडे नैसर्गिक जंगलाप्रमाणे वाढणार आहेत. त्यासाठी १०० बाय ४० स्केअरफुटाचे पट्टे तयार करून ही वृक्ष लागवड मोहीम पूर्ण झाली.या नाविण्यपूर्ण मोहिमेसाठी डॉ. विकास आमटे, डॉ. भरती आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शीतल आमटे, गौतम करजगी, सुधाकर कडू, रवी नलगंटीवार व देशभरातील विविध राज्यांचे युवा कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.अशी आहे वृक्ष लागवडीची पद्धतजपान देशातील डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली वृक्ष लागवड पद्धत मियावाकी जंगल म्हणून ओळखल्या जाते. कमी जागा व कालावधीत घनदाट जंगल तयार होते. वृक्ष लावण्यासाठी निवडलेल्या जमिनीवर गहू, तणीस व मका कणसाच्या सालीचा भूगा करून आच्छादन घातल्या जाते. जीवामृताचा वापर केला जातो. जमीन नांगरून भुसभुशीत केली जाते. त्याचा फायदा झाडाच्या तंतूमुळांना होतो. चार प्रकारच्या वृक्ष प्रजाती निवडण्यात आल्या. त्यामुळे कोणतीही वनस्पती शेजारच्या वनस्पतीच्या वाढीला अडथळा ठरत नाही. ही झाडे एकमेकांपासून ६० सेंटीमीटर अंतरावर लावली जातात.विदर्भातील सर्वाधिक तापमान लक्षात घेता मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करणे उपयुक्त ठरणार आहे. यात जैवविविधता जपल्या जाते. ही १०० टक्के सेंद्रीय पद्धत आहे. याद्वारे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. श्रमसंस्कार छावणीत ६ हजार झाडे लावण्यात आली. पुढील आठवड्यात ७ हजार झाडे लावणार आहोत.-डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक आनंदवन, वरोरा