शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

आनंदवनात ‘अकिरा मियावाकी पॅटर्न’ने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:50 IST

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.

ठळक मुद्देनैसर्गिक पद्धतीने तयार होणार जंगल : श्रमसंस्कार छावणीत देशभरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी

यशवंत घुमे।लोकमत न्यूज नेटवर्कआनंदवन (ता.वरोरा) : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जपानचे डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेल्या ‘पॅटर्न’चा अवलंबून करून समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात परिसरात स्थानिक प्रजातींच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये देशभरातून पाचशे युवक युवतींनी सहभाग झाले आहेत.वाढत्या तापमानापासून सजीव सृष्टीचा ढासळलेला समतोल सांभाळण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे ओळखून आनंदवनच्या वतीने दरवर्षी मूल तालुक्यातील सोमनाथ येथे दरवर्षी श्रमसंस्कार छावणी आयोजित केल्या जाते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा हे शिबिरात आनंदवनात सुरू आहे. या शिबिरादरम्यान विविध प्रजातींची झाडे मियावाकी पद्धतीने लावली जातात.यावर्षी आंबा, बेहडा हिरडा, हल्दू, पेटू, कवठ, शिसम, धामन, बिकामाई, कुसूम, रोहण, आवळा, रक्तचंदन, काळा-पांढरा शिरीष, खडसिंगी आदी मोठे, मध्यम झुडपी आणि लहान आकाराच्या ७४ प्रकारच्या झाडांची दोन एकर परिसरात लागवड करण्यात आली. लागवडीदरम्यान वेगवेगळ्या उंचीच्या वनस्पतींचा नैसर्गिक पद्धतीने मिलाफ करण्यात आला.एकमेकांच्या सहाय्याने व इतर वनस्पतींच्या वाढीला अडथळा न आणता सर्व झाडे नैसर्गिक जंगलाप्रमाणे वाढणार आहेत. त्यासाठी १०० बाय ४० स्केअरफुटाचे पट्टे तयार करून ही वृक्ष लागवड मोहीम पूर्ण झाली.या नाविण्यपूर्ण मोहिमेसाठी डॉ. विकास आमटे, डॉ. भरती आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शीतल आमटे, गौतम करजगी, सुधाकर कडू, रवी नलगंटीवार व देशभरातील विविध राज्यांचे युवा कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत.अशी आहे वृक्ष लागवडीची पद्धतजपान देशातील डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली वृक्ष लागवड पद्धत मियावाकी जंगल म्हणून ओळखल्या जाते. कमी जागा व कालावधीत घनदाट जंगल तयार होते. वृक्ष लावण्यासाठी निवडलेल्या जमिनीवर गहू, तणीस व मका कणसाच्या सालीचा भूगा करून आच्छादन घातल्या जाते. जीवामृताचा वापर केला जातो. जमीन नांगरून भुसभुशीत केली जाते. त्याचा फायदा झाडाच्या तंतूमुळांना होतो. चार प्रकारच्या वृक्ष प्रजाती निवडण्यात आल्या. त्यामुळे कोणतीही वनस्पती शेजारच्या वनस्पतीच्या वाढीला अडथळा ठरत नाही. ही झाडे एकमेकांपासून ६० सेंटीमीटर अंतरावर लावली जातात.विदर्भातील सर्वाधिक तापमान लक्षात घेता मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करणे उपयुक्त ठरणार आहे. यात जैवविविधता जपल्या जाते. ही १०० टक्के सेंद्रीय पद्धत आहे. याद्वारे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. श्रमसंस्कार छावणीत ६ हजार झाडे लावण्यात आली. पुढील आठवड्यात ७ हजार झाडे लावणार आहोत.-डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक आनंदवन, वरोरा