शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा उचलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

जडवाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात ...

जडवाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण

राजुरा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वॉर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला.

उद्योगांची निर्मिती करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, सावली, मूल, आदी तालुक्यांत उद्योग नसल्याने येथे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याताच कोरोना संकटामुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. त्यामुळे रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

जिवती : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून, अपघाताची शक्यता आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. ते खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी करण्यात आली होती.

आठवडी बाजार

सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियम तसेच अटी लादून आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या दिवशी जिल्ह्यात आठवडी बाजार भरत होता. यामुळे छोटे-मोठे व्यापारीही यावर अवलंबून होते. मात्र, बाजार बंद झाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

मच्छरांच्या प्रकोपाने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. नागरिकांकडूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आता बंद झाले आहेत. परंतु, नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.