शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

विनामास्क तो म्हणाला, ‘सारखं थुंकावं लागतं’, ती म्हणाली, ‘मॅचिंगचा मास्क नाही मिळाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 15:50 IST

एका दुकानदाराने वारंवार थुंकावे लागते. त्यामुळे मास्क वापरत नाही असे सांगितले. एका महिलेला व महाविद्यालयीन युवतीला मास्कबाबत बाेलते केले असता, साडी व ड्रेसला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळे मास्क घातला नसल्याचे सांगितले.

चंद्रपूर : जिल्ह्यासह राज्यात काेराेना संकटाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डाेक्यावर आहे. यासंदर्भात वारंवार सूचनाही दिल्या जात आहे. असे असतानाही शहरी भागातील अर्धेअधिक नागरिक मास्कशिवाय बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून ५५-६० वयाेगटातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

मास्क का वापरत नाही, अशी विचारणा केली असता, अनेकांकडून आश्चर्यकारक कारणे ऐकावयास मिळाली. दरम्यान एका दुकानदाराने वारंवार थुंकावे लागते. त्यामुळे मास्क वापरत नाही असे सांगितले. त्यामुळे एका महिलेला व महाविद्यालयीन युवतीला मास्कबाबत बाेलते केले असता, साडी व ड्रेसला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळे आपण मास्क घातला नसल्याचे सांगितले.

प्रशासनाची कारवाईही थंडावली

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महापालिका, जिल्हा प्रशासन व आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाची विनामास्क फिरणाऱ्यांवर करडी नजर हाेती. मात्र, लाट आटाेक्यात आल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. आता शासन व प्रशासनाने काेराेनाबाबतच्या नियमात शिथिलता आणली आहे. त्यामुळे नागरिकही बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात

मुख्य बाजारपेठ -

चंद्रपूर येथील गोल बाजारात बरीच गर्दी असते. येथे रस्त्यालगत माेठमाेठी दुकाने आहेत. यातील काही दुकानदार मास्क घालून दिसले तर काहींनी मास्क हनुवटीवर ठेवला हाेता. ग्राहक व नागरिक विनामास्क आढळून आले. यातील ७० टक्के नागरिक मास्कशिवायच होते.

बंगाली कॅम्प -

चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातही बरीच गर्दी असते. याशिवाय येथे भाजीबाजारही आहे. मात्र अनेक जण मास्क न घालताच बिनधास्त फिरताना दिसून आले. कोरोना संकट होते, हे सुद्धा नागरिक विसरले की काय, अशी शंका यानिमित्ताने येते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर -

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध विभागाचे शासकीय कार्यालये आहे. या परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र अनेकजण या भागात मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसून आले.

मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?

कोरोना संकट आता काही प्रमाणात गेले आहे. रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे मास्क वापरणे बंद केले आहे. मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

-एक नागरिक

मास्कमुळे मेकअप, पुसून जाते. चेहरा पूर्णत: दिसत नाही. याशिवाय अनेक दिवसांपासून ड्रेसनुसार मॅचिंग मास्क मिळाला नाही. सध्या कोरोना प्रादुर्भाव नाही.

-एक नागरिक

कोरोना संकट सध्या काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. प्रशासनातर्फे वारंवार सूचना केल्या जातात. मात्र नागरिक दुर्लक्ष करतात.

-एक नागरिक

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस