शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
2
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
3
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
4
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
5
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
6
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
7
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
8
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
9
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
10
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
12
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
13
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
14
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
15
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
16
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
17
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
18
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
19
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
20
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी

रस्त्याविना जगताहेत मेटेगावचे नागरिक

By admin | Updated: February 18, 2015 00:54 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटगाव येथील नागरिक स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही रस्त्याविना जगत आहेत.

उदय गडकरी सावलीतालुका मुख्यालयापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटगाव येथील नागरिक स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही रस्त्याविना जगत आहेत. येथे केवळ दहा आदिवासी कुटुंब असून ५७ गावकऱ्यांची ही कहानी अतिशय थक्क करणारी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृद्ध व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपारिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे, हे परिसरात सापडत असलेल्या दगडांच्या अवशेषावरुन निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आज येथे केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही गावात जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळालेला नाही. हे गावाचे दुर्दैवविलास आहे. जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांची मोठी कसरत होते. तर दररोज जंगली श्वापदांमुळे भितीचे वातावरण असते. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता, अनेक बाबी उजेडात आल्या. मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्र्यपूर्व काळात या गावामध्ये लोखंड निर्मिती होत असेल, याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपारिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा किमी अंतरापर्यंत लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात. आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकऱ्यांना काही कल्पना नाही. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषावरुन निदर्शनास येते. आजच्या घडीला येथे आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोय या गावात झालेली नाही. अडीच किमी अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु, गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नाही. शिवाय जंगली श्वापदांच्या भितीने जीव मुठीत घेऊन त्यांचे जीवन जगणे सुरू आहे. सुदैवाने जंगली श्वापदांमुळे आतापर्यंत जीवीत हानी झाली नसली तरी, पुढे होणार नाही, याची शक्यता कमीच आहे. वाघाचे दर्शन दररोजच होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.या गावात जवळपास ५०० एकर शेती असल्याचे सातबाराच्या उताऱ्यावरुन दिसून येते. परंतु, गावात ज्यांची शेती आहे ते सर्व मालक वेगवेगळ्या गावात वास्तव्याला गेले आहेत. मात्र त्यांच्या मालकीची शेती या गावात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. नकाशात चारही दिशेने रस्तेगावातून बाहेर गावाला जाण्यासाठी चारही दिशेने रस्ते असल्याची नोंद नकाशामध्ये आढळून येते. परंतु, या गावात जाण्यासाठी प्रत्यक्षात एकही रस्ता नाही. १२७ ते १३० या क्रमांकाच्या सातबारा उताऱ्यात ०.८४ आर.जमीन रस्त्यासाठी असल्याची नोंद आहे. विद्यमान परिस्थितीत ही सर्व जागा वनविभागाची असल्याचे समजते. वन कायद्याची अडचणजंगलाच्या ज्या भागातून मेटेगावला जाण्यासाठी पायवाट आहे. ते संपूर्ण जंगल कम्पार्टमेंट नं. १८४ चे असून पूर्णत: वन विभागाच्या मालकीचे आहे. त्यामुळे वन कायद्याचा अडसर याही ठिकाणी आला आहे.