शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

कर्जमाफीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:59 PM

एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर हीच स्थिती : जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूरकडे धाव

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. अशातच राज्य सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याची अट ठेवल्याने दुर्गम भागातील शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यासाठी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिवती व कोरपना तालुक्यातील या गंभीर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ही अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूर येथील इंटरनेट कॅफेमध्ये रिघ लागली आहे. लिंक नसल्यामुळे वेबसाईट दिवसभर बंद असते. अशावेळी ताटकळत वाट बघण्यापेक्षा गावाकडे जाऊन पुन्हा दुसºया दिवशी परत यावे लागते. शेतकºयांना कॅफेमध्ये आपला नंबर लावायचा झाल्यास सकाळचे जेवण न करता पहाटेच वाहन पकडून गडचांदूर गाठावे लागते. जिवती तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील शेतकरी रोज ये-जा करीत आहे. मात्र वाट बघूनही अर्ज न भरल्याने त्यांना फार मानसिक त्रास होत आहे. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या भानगडीत अनेक शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.महिला शेतकºयांचीही गर्दीज्यांच्या नावाने शेतजमीन आहे, त्यांनाच अर्ज भरता येतो. सातबारा ज्यांच्या नावे आहे, त्यांचा अंगठ्याचा ठसा आॅनलाईन घेतल्याशिवाय अर्ज अधिकृत होत नाही. कारण शेतकºयाची खरी माहिती पटावी, यासाठी आधार लिंक असल्याने बोटाचा ठसा महत्वाचा झाला आहे. शेतजमीन नावावर असणाºया अनेक शेतकरी महिलासुद्धा आहे. त्यामुळे महिलांना घरकामे सोडून दोन-तीन दिवस पूर्णवेळ खर्च करावे लागत आहे.आमच्या जिवती तालुक्यात इंटरनेट बरोबर नसल्याने मी गडचांदूरला येऊन अर्ज भरीत आहो. सर्व कागदपत्रे घेऊन वाट बघत आहो. पण नंबरच लागत नाही. पुढच्या शेतकºयाला विचारल्यास लिंक नाही म्हणून सांगण्यात येते. असे करता-करता पाच दिवस झाले. पण अजूनही अर्ज भरला नाही. कामधंदे सोडून ४५ किलोमीटर दुरून आल्यानंतर काम होत नाही.- अंगद शिवराज ठोंबरे, नारपठारयाअगोदर पण कर्जमाफी झाली होती. तेव्हा आम्ही बँकेत न जाता बँकेचे कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि अर्ज भरायचे. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. आता आमचा त्रास वाढला आहे. शेतातील कामे सोडून आम्ही रोज अर्ज भरायला येत आहो. तरी पण अर्ज भरल्या जात नाही आहे. काय करावे काहीच समजत नाही.-पांडुरंग साधू सूर्यवंशी,मरकलमेटाजनतेला रांगेत उभे करण्याचे धोरणज्याप्रमाणे नोटाबंदी करून मोदी सरकारने देशातील जनतेला रांगेत उभे केले. तसेच फसवी कर्जमाफी करून राज्यातील फडणवीस सरकारने गरीब शेतकºयांना रांगेत उभे केले. जनतेला रांगेत उभे करून त्रास देण्याचे भाजपा सरकारचे धोरण आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेट पोहचले नसल्याने शेतकरी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीे. शेतातली कामे सोडून ४-५ दिवस शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. कोणतीही अट न ठेवता शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- सुभाष धोटे, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस