पंचायत समित्याच घाणीच्या विळख्यात

By Admin | Updated: November 12, 2014 22:40 IST2014-11-12T22:40:15+5:302014-11-12T22:40:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात

The Panchayat Samiti is known for its deterioration | पंचायत समित्याच घाणीच्या विळख्यात

पंचायत समित्याच घाणीच्या विळख्यात

दिव्याखाली अंधार
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. मात्र, ज्या विभागांवर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच कार्यालये घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी आज लोकमत चमूने भेटी देऊन तेथील स्वच्छतागृह, परिसराची परिस्थिती जाणली. मात्र, पंचायत समित्यांत दिव्याखालीच अंधार असल्याचे अतिशय विदारक चित्र जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांत लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. कार्यालयातील कर्मचारीही अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
जिवती पंचायत समितीत कागदावर स्वच्छता
पाच हजार लोकसंख्येच्या जिवती पंचायत समितीत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भेट दिली असता, स्वच्छता अभियान केवळ कागदावर दिसून आले. फलक लावून जनजागृतीचा संदेश देणाऱ्या कार्यालयातच स्वच्छतेचे ंिधंडवडे निघाले असून स्वच्छतागृहे तंबाखू, खर्रा, गुटख्याने रंगलेली आहेत. तर मुत्रीघरात पाण्याची सुविधा नसल्याने येथे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. कार्यालय परिसरात कचरा कुंडी नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसून आला. असाच प्रकार इतरही कार्यालयात दिसून आला. त्यामुळे शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहे, हे स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले.
राजुरा पंचायत समितीत स्वच्छतेचे तीन-तेरा
राजुरा येथील पंचायत समितीत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले. शौचालयाची स्वच्छता गेल्या अनेक दिवसांपासून केलेली नाही. त्यामुळे सीट काळीकु ठं झाली आहे. परिसरात असलेला हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून हातपंपाजवळ कचऱ्याचे ढिग जमा झाले आहे. कृषी विभाग कार्यालयाच्या मागच्या बाजुला शेतकऱ्यांना वाटण्यासाठी बैलबंडी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. तर कार्यालयातच महत्वाच्या कामाच्या फाईली अस्ताव्यस्त ठेवलेल्या दिसून आल्या.

Web Title: The Panchayat Samiti is known for its deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.