ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. ...
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून जोरगेवार यांनी ७० हजारांवर मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. तेव्हापासूनच त्यांच्या भूमिका बदलत असल्याचे बघायला मिळते. निवडून येताच त्यांच्यावर शिवसेना व भाजपने बाजी लावल्याची म ...
पावसाअभावी सुमारे तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली तर उर्वरित साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. हंगाम टळला तर उत्पादन घटेल आणि पेरणी केली तर दुबारचे संकट ओढवेल, या धास्तीमुळे शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात च ...
एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबविला जात आहे. सर्वेक्षणअंतर्गत आतापर्यंत १० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली. यात ३० टक्के घरांत डासांची अंडी आढळली आहेत. हे प्रमा ...
शेजारी वैनगंगा नदी आहे. या गावालगतच्या जंगलात वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याकरिता जावेच लागते. त्या ...
अपघातात जखमी किंवा इतर कारणाने जखमी झालेल्या जनावरांवर प्यार फाऊंडेशनच्या वतीने उपचार, देखभाल केली जात आहे. येथे शहरातील १५ ते २० च्या संख्येने विद्यार्थी आपली सेवा नि:शुल्क देत आहे. मात्र या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने ते परीक्षेत गुंतले ...