शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पावसाअभावी धान पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:38 IST

वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे.

ठळक मुद्देमावा तुडतुडा रोगाचे आक्रमण : भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता

निळकंठ नैताम।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे. पावसाने गेल्या २५ ते ३० दिवसाप्ाांसून दडी मारल्याने पाण्याअभावी धानपीक सुकायला लागल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये खरीप, हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकºयांनी नव्या उमेदीने यावर्षी तरी चांगले उत्पादन होणार म्हणून अपार मेहनत करून धान पिकांची लागवड केली. रोवणी झाल्यानंतर पाऊस बºयापैकी आल्याने पिकांची चांगली वाढसुद्धा झाली. मध्यंतरी उन्हाची दाहकता वाढली आणि वातावरणामध्ये बदल झाला. त्यामुळे करपा, गेरू, पांढरा, रोग अशा विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केले. तेव्हा विविध प्रकारची फवारणी करून शेतकºयांनी सदर रोग नियंत्रणात आणले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा वाढल्या. यावर्षी बºया प्रमाणात उत्पादन होणार, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेतकºयांना मात्र पुन्हा मोठा धक्का बसला. धानपीक गर्भाशयातून बाहेर पडून लोंबे तयार होत असतानाच मावा तुडतुडा या रोगाने हल्ला केल्याने हिरवे धानपिक काळसर पडून त्याचे तणसात रूपांतर होणे सुरू झाले आहे. विविध औषधांची फवारणी करूनसुद्धा रोग नियंत्रणात आणणे कठीण झाले असल्याने धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने सुद्धा दडी मारल्याने ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते इंजिन व मोटारपंपाने पाणी करून आपले ेधानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही, ते मात्र वरूण राजाकडे आकाशाला गवसणी घालून पाणी पाडण्याची विनंती करीत आहेत. एकूणच मावा तुडतुडा रोग नियंत्रणात न आल्यास धान उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार आहे.मजुरांचे भाव वधारलेदरवर्षी फवारणीसाठी मजुरांना अर्ध्या दिवसाचे २०० रूपये तर पूर्ण दिवसाचे ३०० रूपये असा दर होता. परंतु यावर्षी अर्ध्या दिवसाचे ३५० तर पूर्ण दिवसाचे ५५० रूपये द्यावे लागत असल्याने उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे.कृषी विभागाचे मार्गदर्शन नाहीकोणत्या रोगांवर नेमकी कोणती औषधी फवारावी, शेतकºयांच्या शेतामध्ये नेमका कोणता रोग लागलेला आहे, याची प्रत्यक्षात खात्री करून त्यांना कृषी अधिकाºयांंकडून मार्गदर्शन केले जात नसल्याने खासगी कृषी केंद्र चालकांनी दिलेल्या औषधांची फवारणी करणे सुरू आहे.