शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

केवळ 88 मिमी पाऊस, जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By राजेश मडावी | Updated: July 6, 2023 17:33 IST

अपुऱ्या पावसाने ६५ हजार हेक्टरमध्येच पेरण्या

चंद्रपूर : खरीप हंगामाची तयारी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अपेक्षाभंगाला सामाेरे जावे लागले. केवळ ८८ मी. मी. पाऊस झाल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर तब्बल ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ५० महसूल मंडळे आहे. यापैकी २९ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ २१ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला. जून महिन्याच्या शेवटीशेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी थोडापाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता स्थिती तयार झाली. जिल्ह्याचे खरीपा हंगामातील एकूण क्षेत्र ४ लाख ९० हजार हेक्टर आहे. जून महिन्यात ७ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.  केवळ या महिन्याच्या शेवटी पाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून टाकली. आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

आठ-दहा गावांतच ९० मी. मी.पाऊस

जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस येतो. मात्र, यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊसही पुरेसा झाला नाही. जून महिन्याच्या २६ दिवसांत जिल्ह्यात केवळ ४२.८ मी.मी. पाऊस झाला. त्यातही केवळ सात ते दहा गावांतच ७५ ते १०० मीमी पाऊस झाला. अन्य ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

यंदाचे पेरणी उद्दिष्ट गाठणार काय ?

जिल्ह्यात ६५ हजार क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात भात ३५३३ हेक्टर, कापूस ४८७७६, तूर ४५२८, तर सोयाबीन ८८१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यात एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि कापूस, तर ८० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.

आतापर्यंतच्या पेरणीची स्थिती (हेक्टरी)भात- ३ हजार ५३३कापूस- ४८ हजार ७७६तूर- ४ हजार ५२८सोयाबीन- ८ हजार ८१०

‘पावसाअभावी पेरणा रखडल्या आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघावी. पेरणीसाठी घाई करणे योग्य नाही. ऊन तापल्यास दुबार पेरणीचा धोका आहे.’

- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस