शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 88 मिमी पाऊस, जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By राजेश मडावी | Updated: July 6, 2023 17:33 IST

अपुऱ्या पावसाने ६५ हजार हेक्टरमध्येच पेरण्या

चंद्रपूर : खरीप हंगामाची तयारी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अपेक्षाभंगाला सामाेरे जावे लागले. केवळ ८८ मी. मी. पाऊस झाल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली तर तब्बल ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात एकूण ५० महसूल मंडळे आहे. यापैकी २९ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ २१ महसूल मंडळात पेरणीयोग्य पाऊस झाला. जून महिन्याच्या शेवटीशेवटी जिल्ह्याच्या ठिकाणी थोडापाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता स्थिती तयार झाली. जिल्ह्याचे खरीपा हंगामातील एकूण क्षेत्र ४ लाख ९० हजार हेक्टर आहे. जून महिन्यात ७ हजार २३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.  केवळ या महिन्याच्या शेवटी पाऊस झाला. याच पावसाच्या भरोवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून टाकली. आता पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

आठ-दहा गावांतच ९० मी. मी.पाऊस

जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस येतो. मात्र, यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊसही पुरेसा झाला नाही. जून महिन्याच्या २६ दिवसांत जिल्ह्यात केवळ ४२.८ मी.मी. पाऊस झाला. त्यातही केवळ सात ते दहा गावांतच ७५ ते १०० मीमी पाऊस झाला. अन्य ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

यंदाचे पेरणी उद्दिष्ट गाठणार काय ?

जिल्ह्यात ६५ हजार क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात भात ३५३३ हेक्टर, कापूस ४८७७६, तूर ४५२८, तर सोयाबीन ८८१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा चार लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यात एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि कापूस, तर ८० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.

आतापर्यंतच्या पेरणीची स्थिती (हेक्टरी)भात- ३ हजार ५३३कापूस- ४८ हजार ७७६तूर- ४ हजार ५२८सोयाबीन- ८ हजार ८१०

‘पावसाअभावी पेरणा रखडल्या आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघावी. पेरणीसाठी घाई करणे योग्य नाही. ऊन तापल्यास दुबार पेरणीचा धोका आहे.’

- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस