१६ हजार उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज

By Admin | Updated: July 22, 2015 01:30 IST2015-07-22T01:30:46+5:302015-07-22T01:30:46+5:30

जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार या अंतिम दिवसापूर्वी ...

Online application for 16 thousand candidates | १६ हजार उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज

१६ हजार उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज

६२८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक : ४२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार या अंतिम दिवसापूर्वी १६ हजार १८६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्जाच्या प्रिंट निवडणूक विभागाकडे सादर केल्या आहेत. अर्जाची छाणणी झाल्यानंतर व २३ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर किती उमेदवार रिंगणात राहणार, हे निश्चीत होणार आहे.
जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर ४३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होत आहे. १३ जुलैपासून आॅनलाईन नामनिर्देशनपत्र मागविण्यात आले होते. २० जुलै ही आॅनलाईन नामनिर्देशन अर्जाची अखेरची तारीख होती. १९ जुलैपर्यंत तब्बल १६ हजार १८६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र आॅनलाईन अर्जाची प्रिंट केवळ ४ हजार १४० उमेदवारांनीच दाखल केले होते. वरोरा तालुक्यातील सर्वाधिक १ हजार ९८८ तर ब्रह्मपुरी तालुक्यात १ हजार ९२६ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. बल्लारपूर ३१६, भद्रावती १ हजार ४५४, चंद्रपूर १ हजार ३३१, चिमूर १ हजार ८६७, गोंडपिंपरी १ हजार २०, जिवती २७, कोरपना ४४४, मूल १ हजार २४, नागभीड १ हजार ३४२, पोंभूर्णा ५५०, राजुरा ५५५, सावली १ हजार १७७ तर सिंदेवाही तालुक्यातून १ हजार १६५ उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. २१ जुलैपासून अर्जाची छानणी होणार असून २३ जुलै रोजी संध्याकाळी ४ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी ४ वाजतानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. मतदान ४ आॅगस्ट रोजी तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आदर्श गावात अविरोध निवडणूक
मूल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १ हजार २४ जणांनी नामांकन दाखल केले. सर्वाधिक नामांकन तालुक्यातील चिरोली ग्राम पंचायतीमध्ये दाखल करण्यात आले. आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत राजगडने फक्त उमेदवाराऐवढेच नामांक दाखल करुन अविरोध ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतल्याने परंपरा कायम राखली आहे. तालुक्यात एकूण ४८ ग्रामपंचायत असून ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ३७ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ३१७ असून यात मारोडा ३७, येरगाव ३०, चिरोली ४८, फिस्कुटी २९, मोरवाही १९, जुनासूर्ला ३०, टेकाडी २५, गांगलवाडी १७, चिमढा २५, राजगड ९, विरई १५, नलेश्वर २४, उथळपेठ १९, मरेगाव २१, राजोली ३५, भवराळा १९, गोवर्धन २०, कवडपेठ २२, डोंगरगाव ३८, हळदी २३, जानाळा १४, सुशी दाबगाव २२, काटवन १५, भादुर्णी २४, मुरमाडीी १५, कोसंबी २६, चितेगाव १९, चिखली २५, चिंचाळा २६, चांदापूर २७, केळझर २६, नवेगाव भूजला २४, बोरचांदली २५, नांदगाव ३०, पिपरी दीक्षित २५, दाबगाव (मक्ता) १९, बोंंडाळा बुज येथे १४ जणांनी नामांकन दाखल केले आहे.
गोंडपिंंपरी तालुक्यात १ हजार २० नामांकन
गोंंडपिंपरी : तालुक्यात एकूण ४३ ग्राम पंचायतीची निवडणूक होत असून सात ग्राम पंचायमध्ये पोटनिवडणूक होत आहे. तालुक्यात मोठ्या ग्राम पंचायतीमध्ये मोडणाऱ्या भं. तळोधी, धाबा, आक्सापूर, करंजी, वढोली, तोहोगाव, लाठी आदींचा समावेश असून यासाठी शेकडोच्या संख्येत नामांकन दाखल झाले आहे. सोमवारी स्थानिक तहसील कार्यालय परिसरात नागरिकांनी नामांकन दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

Web Title: Online application for 16 thousand candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.