एक गाव २४ तास पाणी देणारे !
By Admin | Updated: June 8, 2014 23:46 IST2014-06-08T23:46:34+5:302014-06-08T23:46:34+5:30
उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली.

एक गाव २४ तास पाणी देणारे !
नीळकंठ नैताम- देवाडा(खुर्द)
उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली. दरवर्षी लाखोंचा खर्च होऊनही पाणी टंचाई कायमच. मात्र या प्रकाराला जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील चेकहत्तीबोडी गाव अपवाद ठरत आहे. ही किमया साधली आहे, सौर ऊज्रेने. या ऊज्रेचा वापर करीत गावकर्यांनी नियोजनबद्धरीत्या पाणी प्रश्न मिटविला. आता या गावात २४ तास पाणी मिळत असून स्थानिक मायमाऊलींची पाण्यासाठी होणारी ससेहोलपटही थांबली आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी हे गाव लोकसंख्येच्या विस्ताराने फार लहान असून याठिकाणी ३८५ नागरिक वास्तव्यास राहतात. येथे दोन विहिरी व एक हातपंप अशी पाण्याची व्यवस्था होती. मात्र विहिर व हातपंपांच्या पाण्याची पातळी एप्रिल महिन्यापासून खोल जायची आणि स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. अशातच ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षीच्या वाढत्या लोकसंख्येमुळे परत पाण्याची कमतरता भासत गेली. या परिस्थितीवर कशी मात करावी, हाच प्रश्न गावात चचर्िेला जाऊ लागला. अखेर चकहत्तीबोडी गावात एका हातपंपावर मोटरपंप बसविण्यात आले व त्याला सौरऊज्रेने जोडण्यात आले. त्यावरुन गावात दोन ठिकाणी सार्वजनिक नळ देण्यात आले. सोबतच आठशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविण्यात आली. स्वच्छ सुर्यप्रकाशाने सौरऊज्रेवरील मोटरपंप कार्यान्वित झाला. गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले. विजेची तर बचत झालीच पण गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले.
या गावातील शेतकरी अनिल सातपुते म्हणाले, गावात सौरऊज्रेवरील पाणी पुरवठा सुरू झाल्याने या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. वर्षभरापासून कुणालाही शेतात किंवा इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागत नाही. शेतमजुरी करताना पाण्यासाठी मोठी पंचायत व्हायची. परंतु आता नळाचे मुबलक पाणी मिळत असल्याने मजुरीही बुडत नाही आणि पाण्यासाठी भटकंतीही करावी लागत नाही.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या गावाची निवड करून सौरऊज्रेच्या माध्यमातून आठशे लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीद्वारे स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले असून २४ तास पाणी देणारे चकहत्तीबोडा हे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावांनी घेतली तर मोठय़ा प्रमाणात पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.