शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्य सरकारसाठी ओबीसींनी मागितली भीक, शिष्यवृत्तीसाठी निधीची तरतूद न केल्याने संताप

By राजेश मडावी | Updated: September 21, 2023 15:41 IST

भिकेत मिळालेली रक्कम शासनाकडे मनीऑर्डरने रवाना करण्यात आली

चंद्रपूर : ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृह, आधार योजना, विदेश शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली नाही, असा आरोप करून ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी सेवा संघातर्फे गुरुवारी गांधी चौकात भीक मांगो सत्याग्रह केला. भिकेत मिळालेली रक्कम शासनाकडे मनीऑर्डरने रवाना करण्यात आली.

मागील सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतिगृहांचा विषय शासनाने सोडवला नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे व आधार योजनेपासून वंचित आहेत. वसतिगृह सुरू होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. मात्र अजूनही वसतिगृह सुरू झालेली नाहीत. विद्यार्थ्यांना मिळेल ते काम करून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक विद्यार्थी गरिबीमुळे खचून गेले. शाळा-महाविद्यालये सुरू होऊन तीन महिने झाले. ७ हजार २०० विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृहे, २१ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, ७५ विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असताना शासनाने सुरू केल्या नाहीत.

शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही, असा आरोप करून शासनाचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह करण्यात आला. आंदोलनात ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, जिल्हा महासचिव ॲड. विलास माथनकर, भाविक येरगुडे, प्रलय म्हशाखेत्री, अक्षय येरगुडे, गोमती पाचभाई, भूषण फुसे, गीतेश शेंडे सहभागी झाले होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीStudentविद्यार्थीagitationआंदोलनchandrapur-acचंद्रपूर