शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकेचाच उपचाराअभावी मृत्यू, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:24 IST

परिचारिका संघटना आक्रमक

चंद्रपूर : रुग्णांची सेवा शुश्रूषा करून त्यांना लवकर बरे करण्याची मुख्य भूमिका बजावणाऱ्याचा परिचारिकेचा चक्क उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. इतरांना सेवा देणाऱ्या परिचारिकांनाच वेळेवर उपचार मिळत नसेल तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा निषेध करत परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन केले. सीमा मेश्राम (२९) असे मृत परिचारिकेचे नाव आहे.

सीमा मेश्राम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका होत्या. १६ ऑगस्ट रोजी प्रसूती वॉर्डामध्ये रात्रपाळीत त्या कर्तव्यावर होत्या. दरम्यान, त्यांना भोवळ आली. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, त्यावेळी तेथे एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतही सीमाला उपचारच मिळाला नाही. प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरांकडे नेले. नंतर शुक्रवारी तातडीने नागपूरला नेले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले.

आरएमओ, डीनचा प्रतिसादच नाही

या घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक निवृत्ती जीवने यांना ‘लोकमत’ने संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांना तसा संदेशही पाठवला. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.

मृत्यू प्रकरणाची चौकशी करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, पालकमंत्री आढावा घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहेत, असा आरोप करत रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ज्ञ डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूरDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल