शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येणार ६० दिवसांआधी, तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:04 IST

Chandrapur : प्रवशांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने आरक्षणासाठीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणून प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही तर ६० दिवसांच्या निर्णयामुळे आणखी "वेटिंग" वाढेल. यातून आणखी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे. 

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सोयीचे होते; परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे ६० दिवसातच करावे लागेल. ऐन दिवाळीच्या हंगामात घेतलेला निर्णय हा प्रवाशांना फटका देणारा असून रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

१२० दिवसच कायम राहावा "रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवसच कायम राहावा."- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, बल्लारपूर.

"हा निर्णय चुकीचाच ६० दिवसानंतर कुठे जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास ढकलावा लागेल. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण पूर्वीचेच ठेवावे." - अतुल भांबोरे, जनाधार अधिवक्ता संघ

"तारखेनुसार नियोजन ज्या तारखेनुसार जायचे असेल, त्यानुसार तिकिटाचे नियोजन करावे लागेल. याचा त्रास पर्यटनाला जाणाऱ्यांना होणार, यामुळे वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम ठेवावा."- विवेक खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर