शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येणार ६० दिवसांआधी, तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:04 IST

Chandrapur : प्रवशांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने आरक्षणासाठीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणून प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही तर ६० दिवसांच्या निर्णयामुळे आणखी "वेटिंग" वाढेल. यातून आणखी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे. 

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सोयीचे होते; परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे ६० दिवसातच करावे लागेल. ऐन दिवाळीच्या हंगामात घेतलेला निर्णय हा प्रवाशांना फटका देणारा असून रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

१२० दिवसच कायम राहावा "रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवसच कायम राहावा."- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, बल्लारपूर.

"हा निर्णय चुकीचाच ६० दिवसानंतर कुठे जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास ढकलावा लागेल. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण पूर्वीचेच ठेवावे." - अतुल भांबोरे, जनाधार अधिवक्ता संघ

"तारखेनुसार नियोजन ज्या तारखेनुसार जायचे असेल, त्यानुसार तिकिटाचे नियोजन करावे लागेल. याचा त्रास पर्यटनाला जाणाऱ्यांना होणार, यामुळे वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम ठेवावा."- विवेक खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर