शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

महाविद्यालयातच मिळणार आता वाहन चालविण्याचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:44 AM

वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा त्रास होणार कमी : मुंबई, नागपूर, चंद्रपूरमध्ये प्रथम राबविण्यात आला प्रयोग

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे. यापूर्वी मुंबई, कल्याण, नाशिक, चंद्रपूर, आणि नागपूर येथील परिवहन विभागाने हा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.स्पर्धेच्या युगात प्रत्येकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही यामध्ये मागे नाही. मात्र वाहन असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. परिणामी एखाद्यावेळी दुर्घटना झाल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात.पूर्वी परवान्यासाठी परिवहन कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर कार्यालयाने दिलेल्या दिवशी जाऊन संगणकीय चाचणी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. यामध्ये वेळ वाया जात होता. त्यामुळे परिवहन विभागाने वाहनचालकांना परवाना देण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या दिवशी नंबर असेल त्या दिवशी कार्यालयात जाऊन संगणकीय चाचणी झाल्यानंतर लर्निंग लायसन्स देण्यात येत होते. मात्र यामध्येही अर्ज करणे, सांगितलेल्या दिनांकाला उपस्थित राहणे यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनसाठी त्रासदायक बनली होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाने शिबिराच्या माध्यमातून परवाना वितरण करण्याचा कार्यक्रम आखला.यामध्ये प्रथमदर्शी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर या कार्यालयाने यशस्वीरित्या शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना वितरित केला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.त्यामुळे राज्यशासन तसेच परिवहन विभागाने आता राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये असे शिबिर आयोजित करून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देण्याची योजना आखली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नसून वेळ आणि पैसाही वाचणार आहे.असे आयोजित होणार शिबिरपरिवहन अधिकारी प्रत्येक महाविद्यालयांना पत्र देऊन महाविद्यालयाची परवानगी घेणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन एखादा दिवस ठरवून त्या दिवशी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये महाविद्यालयातील संगणकांचा वापर करण्यात येणार आहे. आता परिवहन विभागांकडे टॅब आले असून त्यामाध्यमातूनही शिबिरस्थळी परवाना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार फायदाअनेकवेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी जिल्हास्तरावर किंवा परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या तालुकास्तरावरील एखाद्यास्थळी जाऊन परवाना काढावा लागतो. यामध्ये त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता मात्र महाविद्यालयामध्येच लर्निंग लायसन्स परवाना मिळणार असल्याने त्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस